शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
6
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
8
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
9
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
10
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
11
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
12
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
13
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
14
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
15
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
16
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
17
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
18
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
19
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
20
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

90 टक्के भारतीय संगणक वापरकर्त्यांना पाठवता येत नाही ई-मेल

By admin | Published: April 26, 2016 1:42 PM

देशभरातील संगणक वापरकर्त्यांपैकी फक्त 14.2 टक्के लोकांना टेक्स्ट फाईल बनवता येते, तर 12 टक्क्यांपेक्षाही कमी लोकांना मेल पाठवण्याचं ज्ञान आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 26 - एकीकडे केंद्र सरकार डिजीटल इंडिया कॅम्पेनवर लक्ष केंद्रीत करत असताना भारतातील संगणक साक्षरतेचं प्रमाण खूपच कमी असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय संगणक वापरकर्त्यांच्या साक्षरतेसंबंधी एक अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. देशभरातील संगणक वापरकर्त्यांपैकी फक्त 14.2 टक्के लोकांना टेक्स्ट फाईल बनवता येते. तर फक्त 12.4 टक्के लोकांना मेल पाठवण्याचं ज्ञान आहे. इतर लोकांना मेल कसा पाठवायचा ? किंवा तो कसा तयार करायचा ? याची काहीच माहिती नसल्याचं समोर आलं आहे.
 
नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसने हा अहवाल प्रसिद्द केला आहे. अहवालानुसार शहरांशी तुलना करता ग्रामीण भागातील संगणक साक्षरतेचं प्रमाण खूप कमी आहे. ग्रामीण भागात फक्त 7.8 टक्के लोक संगणकाचा वापर करतात. शहरी भागातील परिस्थिती ग्रामीण भागापेक्षा चांगली असून 28 टक्के लोकांना संगणकावरील वर्ड फाईलचं ज्ञान आहे. 
अहवालानुसार फक्त 13.5 टक्के संगणक वापरकर्त्यांना इंटरनेटवर सर्च करता येतं. ग्रामीण भागात हे प्रमाण 7.3 टक्के आहे. देशातील फक्त 12.4 टक्के लोकांना ईमेल पाठवण्याचं ज्ञान आहे. ग्रामीण भागात तर फक्त 6 टक्के लोकांना मेल कसा पाठवायचा हे माहित आहे. अहवालात तरुणांसंबंधी देण्यात आलेली माहिती धक्कादायक आहे. 14 ते 29 वयोगटातील फक्त 27.8 टक्के तरुणांना संगणक वापरता येतो. याचा अर्थ प्रत्येक तिसरा तरुण संगणक असाक्षर आहे. याचप्रमाणे 30 ते 45 वयोगटातील 90 टक्के लोक संगणक वापराबद्द्ल अनभिज्ञ आहेत.