शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
2
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
3
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
4
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
5
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
6
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
7
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
8
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
9
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
10
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
11
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
12
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
13
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
14
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
15
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
16
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

९६८७ प्रवासी तिकीट काढूनही प्रवासापासून वंचित; एअर इंडियाच्या ६७०० प्रवाशांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 2:43 PM

७० टक्के प्रवासी हे एअर इंडियाचे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: एकीकडे दिवसाकाठी देशात विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असली तरी दुसरीकडे विमान कंपन्यांच्या तांत्रिक मुद्द्यांमुळे प्रवाशांना वंचित राहण्याचे प्रमाणदेखील वाढताना दिसत आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत देशातील सर्व प्रमुख कंपन्यांनी एकूण ९६८७ प्रवाशांना विमान प्रवासापासून वंचित ठेवले असून त्यातील जवळपास ७० टक्के प्रवासी हे एअर इंडियाचे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

एअर इंडियाने सहा महिन्यांत वंचित ठेवलेल्या प्रवाशांची संख्या ६७०० एवढी आहे. प्रवाशांकडून तिकीट रद्द होण्याची शक्यता गृहित धरून कंपन्या विमानातील आसन क्षमतेपेक्षा काही टक्के अधिक तिकिटविक्री करतात.

मुळात गेल्या दीड वर्षापासून विमान प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ झाल्याने तिकिटे रद्द होण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. मात्र, तरीही विमान कंपन्यांकडून अतिरिक्त तिकिटांची विक्री केली जात असल्याने अधिकाधिक प्रवाशांवर प्रवासापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे.

विमान रद्द होणे,अन्यत्र वळवणे याचा प्रवाशांना फटका बसतो. तांत्रिक बिघाडामुळे विमान रद्द करण्यामुळे प्रवासी वंचित राहत असल्याचे स्पष्ट झाले.   प्रवासापासून वंचित राहिलेल्या प्रवाशांना परताव्यापोटी कंपन्यांनी सहा महिन्यांत एकूण साडे सात कोटी खर्च केल्याची आकडेवारीही समोर आली आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमान