शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रक्तरंजित फाळणीत ऐक्याचे दर्शन; आज मात्र धार्मिक तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 12:16 IST

औरंगजेबाच्या काळात या ठिकाणी शेर मोहम्मद खान यांची राजवट होती. औरंगजेबाने गुरू गोविंदसिंगजी यांच्या दोन मुलांची निर्घृण हत्या केल्याचा निषेध करणारे पत्र शेर मोहम्मद खान यांनी औरंगजेबास पाठविले. इस्लाम अशा अत्याचारास मान्यता देत नाही, त्या निष्पाप मुलांचा काय दोष होता? असा सवाल त्याने केला होता...

यदू जोशी

मलेरकोटला (पंजाब) : भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी संपूर्ण पंजाब रक्ताची होळी खेळत असताना अभूतपूर्व धार्मिक एकोप्याचे दर्शन घडविलेल्या मलेरकोटलामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा बोलबाला दिसत आहे. हिंदू-शीख-मुस्लीम ऐक्याचा इतिहास असलेला हा मतदारसंघ सध्या धार्मिकतेवर विभागल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. 

औरंगजेबाच्या काळात या ठिकाणी शेर मोहम्मद खान यांची राजवट होती. औरंगजेबाने गुरू गोविंदसिंगजी यांच्या दोन मुलांची निर्घृण हत्या केल्याचा निषेध करणारे पत्र शेर मोहम्मद खान यांनी औरंगजेबास पाठविले. इस्लाम अशा अत्याचारास मान्यता देत नाही, त्या निष्पाप मुलांचा काय दोष होता? असा सवाल त्याने केला, त्यांना का मारले? मी केला असता त्यांचा सांभाळ अशी भावनिक वाक्ये त्या पत्रात होती. 

मलेरकोटलातील ज्येष्ठ पत्रकार सुमंत तलवानी यांच्या मते मुस्तफा यांची भाषा भावना भडकविणारी आहे, ते प्रशासनाला धमकी देताहेत. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. मोहम्मद रफी यांच्या मते मुस्तफा यांच्यावरील आरोप निराधार आहेत, ते तसे बोललेच नव्हते.

एकीचे दर्शन...फाळणीचे चटके बसलेली पिढी आजही आहे आणि तिने अनुभवलेल्या वेदना पुढच्या पिढीच्याही अंतर्मनात आहेतच. त्याला अपवाद आहे ते राजधानी चंडीगडपासून ९० किलोमीटरवर असलेले मलेरकोटला. बहुतेक ठिकाणचे मुस्लीम पाकिस्तानात गेले; पण हिंदू-शिखांनी त्यावेळी या ठिकाणच्या मुस्लिमांना पाकिस्तानात जाऊ दिले नाही. उलट त्यांच्यावर कोणी बाहेरून येऊन हल्ला करू नये यासाठी संरक्षक भिंत उभारली. ती मुुस्लिमांच्या एका राजाने शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंगजी यांच्याप्रती दाखविलेल्या श्रद्धेची परतफेड होती. 

माजी डीजीपींचे ते विधान अन् पत्नी रझियांची अडचणया छोटेखानी शहरात निवडणूक धार्मिक वळणावर जाण्यासाठी कारणीभूत ठरले आहे ते पंजाबच्या सामाजिक सुरक्षा तसेच महिला व बालकल्याण मंत्री रझिया सुलताना यांचे पती मोहम्मद मुस्तफा यांचे कथित विधान. मुस्तफा हे राज्याचे माजी पोलीस महासंचालक आहेत. त्यांना चार शौर्यपदके मिळालेली आहेत. रझिया काँग्रेसच्या तीन वेळा आमदार असून विद्यमान उमेदवारदेखील आहेत.  मुस्तफा हे नवज्योतसिंग सिद्धू यांचे सल्लागार मानले जातात. अगदी अलीकडे मुस्तफा यांनी ‘मै हिंदुओं को मारूँगा’ असे विधान केल्याचा आरोप आहे. मात्र, ‘मैं फितनों को मारूँगा’ असे विधान मी केले होते, हिंदूंबाबत बोललोच नव्हतो, असा मुस्तफा यांचा दावा आहे.  माझा लढा माझ्या कौमसाठी आहे, माझ्यापेक्षा मोठा जलसा कोणी घेतला तर मी प्रशासनाला सांभाळता येणार नाही, अशी परिस्थिती मी निर्माण करीन असे ते म्हणाले होते.  

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ElectionनिवडणूकHinduहिंदूMuslimमुस्लीम