शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

विरोधी ऐक्याला मोठा धक्का, भाजपाविरोधातील राष्ट्रव्यापी आघाडीत सहभागी होण्यास शिवसेनेच्या मित्रपक्षाने दिला नकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 11:01 AM

K Chandrashekar Rao News: तेलंगाणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या एका विधानामुळे विरोधी पक्षांच्या ऐक्याला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

हैदराबाद - २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एक राष्ट्रव्यापी आघाडी तयार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपासमोर आव्हान उभे करण्याची तयारी विरोधी पक्षांकडून सुरू आहे. मात्र तेलंगाणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या एका विधानामुळे विरोधी पक्षांच्या ऐक्याला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राव यांनी बुधवारी सांगितले की, ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गैर-काँग्रेस आणि गैर-भाजपा पक्षांची राजकीय आघाडी तयार करण्याच्या बाजूने नाही आहेत. सध्या देशाला अशा आघाडीऐवजी टीआरएसप्रमाणे एका पर्यायी अजेंड्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वीच चंद्रशेखर राव यांनी विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

पक्षाच्या २१व्या स्थापना दिवशी झालेल्या बैठकीला संबोधित करताना के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले की, डाव्या पक्षांनी हल्लीच माझी भेट घेऊन केंद्रातून भाजपाला हटवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला होता. मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, सांगितले की, पंतप्रधानांना हटवण्याचा विषय चुकीचा होता. शेवटी लोकशाहीचा विजय झाला पाहिजे.

उल्लेखनीय बाब म्हणजे चंद्रशेखर राव यांनी केलेलं हे विधान त्यांच्या भाजपाविरोधातील आधीच्या विधानांपेक्षा एकदम विरुद्ध आहे. त्यांनी ११ एप्रिल रोजी दिल्लीमध्ये आंदोलन केले होते. त्यात मोदींना उद्देशून म्हटले होते की, त्यांनी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नये, अन्यथा जनता त्यांचे सरकार पाडेल. मात्र बुधवारच्या आपल्या भाषणामध्ये त्यांनी सांगितले की, टीआरएस एक प्रादेशिक पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याकडे टीआरएसला राष्ट्रीय पक्षामध्ये बदलण्याचाही सल्ला आला होता. तसेच टीआरएसचं नाव बदलून भारतीय राष्ट्र समिती करण्याचाही सल्ला मिळाला होता.

दरम्यान, केसीआर यांनी सांगितले की, जर हैदराबादमधून देशाची दिशी बदलणार असेल तर ती तेलंगाणाच्या जनतेसाठी अभिमानाची बाब असेल. टीआरएस पर्यायी अजेंडा तयार करण्यासाठी आणि देशाला नवी दिशा देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. दरम्यान, पर्यायी शक्ती लवकरच समोर येईल आणि एक राजकीय वादळ निर्माण करील, असा विश्वासही केसीआर यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :TelanganaतेलंगणाBJPभाजपाPoliticsराजकारण