शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
5
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
6
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
7
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
8
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
9
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
10
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
11
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
12
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
13
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
14
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
15
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
16
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
17
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
19
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
20
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

"...म्हणून आज सरकारवर टीका करायची असेल तर अदानी-अंबानींचं नाव समोर येतं," शरद पवार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2023 8:28 AM

हिंडनबर्गच्या अहवालाला आवश्यकतेपेक्षा जास्त महत्त्व देण्यात आलं, शरद पवार यांचं वक्तव्य.

अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अदानी समूहाविरुद्धच्या अहवालावरून निर्माण झालेल्या वादाची संसदेच्या संयुक्त संसदीय समितीकडून (JPC) चौकशी करण्याची मागणी निरर्थक आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं. हिंडनबर्गच्या अहवालाला आवश्यकतेपेक्षा जास्त महत्त्व देण्यात आलं असून, या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या समितीमार्फतच चौकशी झाली पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, आपण महाराष्ट्रातील सहकाऱ्याच्या मताशी सहमत नाही, असं स्पष्ट मत हिंडेनबर्ग अहवालाच्या जेपीसी चौकशीच्या काँग्रेसच्या एकतर्फी मागणीवर शरद पवार यांनी व्यक्त केलं. याशिवाय त्यांनी अदानी समूहाचं समर्थनही केलं. सोबतच यासोबत त्यांनी हिंडेनबर्ग अहवालातून निर्माण केलेल्या कथनावर टीका केली. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. “कोणत्याही मुद्द्यावर चर्चा होणं आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यानं संपूर्ण प्रक्रियेचं नुकसान होतं. हिंडेनबर्ग अहवालाला विरोधकांकडून गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं गेलं. याची पार्श्वभूमी कोणालाही माहित नाही, ना आम्ही त्याचं नाव ऐकलंय,” असंही ते म्हणाले.

जेपीसीची गरज नाही“या प्रकरणी एका व्यावसायिक समूहाला लक्ष्य करण्यात आलं. परंतु जेपीसीनं हा मुद्दा सुटणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनंच सत्य सर्वोसमोर येईल. या प्रकरणी जेपीसीची आवश्यकता नाही, त्याचं काही महत्त्व नसेल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. “माझं मत वेगळं आहे. अनेक प्रकरणात जेपीसीची मागणी करण्यात आली. एकदा कोका-कोला प्रकरणी जेपीसी नियुक्त करण्यात आली होती. मी त्याचा अध्यक्ष होते. यापूर्वी अशी मागणी झाली आहे आणि ती होणं चुकीचं नाही. परंतु जेपीसीची मागणी का केली गेली? एका व्यवसायिक संघटनेचा तपास व्हावा यासाठी जेपीसीची मागणी करण्यात आली आहे,” असं पवार यांनी नमूद केलं.

तेव्हा आम्ही टाटा बिर्लावर टीका करायचोकाही वर्षांपूर्वी आम्ही राजकारणात आलो तेव्हा सरकारविरोधात बोलायचं होतं, तेव्हा आम्ही टाटा बिर्लांविरोधात बोलत होते. परंतु टाटांचं-बिर्लांचं योगदान काय होतं, हे पाहिल्यानंतरही आम्ही टाटा बिर्ला का करत होतो? हे आम्ही समजलो नाही. पण कोणाला टार्गेट करायचं होतं. टाटा-बिर्लांचं नाव घेत होतो. आज त्यांचं नाव नाही, लोकांसमोर नवे टाटा-बिर्ला आले. म्हणूनच आजकाल सरकारविरोधात टीका करायची असेल तर अदानी-अंबानी यांचं नाव समोर येतं. ज्यांच्यावर टीका करत त्यांनी अधिकारांचा चुकीचा वापर केला, चुकीचं काम केलं, लोकशाहीत त्यांच्याविरोधात बोलण्याचा १०० टक्के अधिकार आहे. परंतु काहीही न करता हल्लाबोल करणं मी समजू शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीAdaniअदानीSharad Pawarशरद पवार