शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

राहुल गांधींसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर गुन्हा दाखल, हिमंत बिस्वा सरमांच्या आदेशानंतर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 11:30 PM

Rahul Gandhi: भारत जोडो न्याय यात्रेवर निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात आसाममध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये आहे.

भारत जोडो न्याय यात्रेवर निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात आसाममध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये आहे. यादरम्यान राहुल गांधी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा समरा यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकी घडत असून, आता मुख्यमंत्री सरमा यांनी दिलेल्या आदेशांनंतर राहुल गांधी आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. राहुल गांधींसह, के. सी. वेणुगोपाल, कन्हैया कुमार आणि इतर नेत्यांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी हे आसाममध्ये हिमंत बिस्वा सरमा यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. सरमा यांच्या नेतृत्वाखाली आसामची अवस्था बिकट झाली आहे. तरुणांना रोजगार मिळत नाही आहेत. शेतकरी त्रस्त आहेत. आता आसाममध्ये न्याय यात्रेत अडथळे  आणले जात आहेत. मी ज्या कुणाबरोबर बोलतोय, तो मुख्यमंत्र्यांबाबत तक्रार करत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

दरम्यान, आता राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याची माहिती हिमंता बिस्वा सरमा यांनी सोशल मीडियावरून  दिली आहे. त्यात त्यांनी लिहिलं की, काँग्रेसच्या सदस्यांकडून आज झालेला हिंसाचार, चिथावणी, सार्वजनिक मालमत्तेचं झालेलं नुकसान, पोलीस कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले याबाबत राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, कन्हैया कुमार आणि इतर लोकांविरोधात कलम १२० बी, १४३/१४७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राAssamआसामcongressकाँग्रेस