शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायास कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
3
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
4
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
5
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
6
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
7
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
8
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
9
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
10
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
11
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
12
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
13
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
14
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
15
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
16
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
17
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
18
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
19
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
20
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?

अग्नितांडव! जयपूर दुर्घटनेत आतापर्यंत १४ मृत्यू; जळालेले मृतदेह ओळखणेही कठीण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 10:16 IST

या दुर्घटनेवर सुप्रीम कोर्टाने कमिटी ऑन रोड सेफ्टी यांच्या मुख्य सचिवांकडून रिपोर्ट मागवला आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एक कमिटीही बनवण्यात आली आहे. 

जयपूर - शहरातील भीषण अग्निकांडात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत यात १४ लोकांचा मृत्यू झाला आहे तर ३० हून अधिक लोक जखमी आहेत. २८ लोक ८० टक्क्याहून अधिक भाजले आहेत. ज्यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्घटनेतील अनेक मृतदेह ओळखणेही कठीण झाले आहे. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी सरकारने डीएनए चाचणीचा निर्णय घेतला आहे. मृतकांचे DNA नमुने पाठवले जातील. अपघातातील बस जळून राख झाली आहे. १६ महिन्यापूर्वीच या बसचा परवाना संपला असल्याचं पुढे आले आहे.

२० डिसेंबरला जयपूर अजमेर हायवेवर सकाळी ६ च्या सुमारास एलपीजी टँकर आणि ट्रक यांच्यात जोरदार टक्कर झाली. या अपघातानंतर एलपीजी टँकरचा स्फोट झाला त्यामुळे आसपासची ४० वाहने आगीच्या विळख्यात सापडली. या भयानक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात जिवंत जळालेल्या लोकांचे मृतदेह छिनविछिन्न अवस्थेत दिसून येत आहेत. यातील जखमी ८० टक्क्याहून अधिक भाजले आहेत. या दुर्घटनेवर सुप्रीम कोर्टाने कमिटी ऑन रोड सेफ्टी यांच्या मुख्य सचिवांकडून रिपोर्ट मागवला आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एक कमिटीही बनवण्यात आली आहे. 

अपघातात प्राण गमावलेल्या मृत आणि जखमींना भरपाई जाहीर करण्यात आली आहे. राजस्थान सरकार मृतांना ५ लाख रुपये आणि जखमींना १ लाख रुपयांची मदत करणार आहे. त्याचवेळी केंद्र सरकारने मृतांना २ लाख रुपये देण्याची घोषणाही केली आहे. या दुर्घटनेत ड्युटीवरून घरी परतणाऱ्या राजस्थान पोलिसातील २८ वर्षीय महिला कॉन्स्टेबल अनिता मीना यांचाही मृत्यू झाला आहे. त्याचवेळी ऑटो चालक शत्रुघ्नचा अपघातानंतर झालेल्या भीषण स्फोटामुळे चेहरा चांगलाच भाजला आहे. त्याने ऑटो सोडून तिथून पळ काढल्याने त्याचा कसा तरी जीव वाचला आहे. आग इतकी वेगाने पसरली की ४० हून अधिक गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. टँकरच्या मागे धावणारी एक स्लीपर बस आणि महामार्गाच्या बाजूला असलेली पाईप फॅक्टरीही जळाली.

शुक्रवारी सकाळी भारत पेट्रोलियमचा टँकर अजमेरहून जयपूरच्या दिशेने येत होता. ५.४४ मिनिटांनी टँकरने दिल्ली पब्लिक स्कूलसमोर यू-टर्न घेतला. यावेळी जयपूरहून अजमेरकडे जाणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिली. धडकेमुळे टँकरचे ५ नोझल तुटले आणि १८ टन गॅसची गळती झाली. यामुळे एवढा शक्तिशाली स्फोट झाला की संपूर्ण परिसर आगीच्या गोळ्यात बदलला. टँकरचा स्फोट झाला तेथून २०० मीटर अंतरावर एलपीजीने भरलेला दुसरा टँकर होता. सुदैवाने  त्याला आग लागली नाही अशी माहिती गेल इंडिया लिमिटेडचे अधिकारी सुशांत कुमार सिंह यांनी दिली.  

टॅग्स :fireआग