शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
4
काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
6
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
7
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
8
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
9
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
10
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
11
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
12
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
13
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
14
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
15
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
16
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
17
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
19
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
20
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी

उभ्या एक्स्प्रेसला मालगाडीची धडक: एक डबा जागेवरच उडाला; चालकाच्या एका चुकीमुळे ९ प्रवाशांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 08:15 IST

कांचनजंगा एक्स्प्रेसचा एक डबा जागेवरच उडाला, दोन घसरले.

न्यू जलपायगुडी / कोलकाता : पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये सोमवारी सकाळी एका मालवाहू रेल्वेगाडीने दिलेल्या जोरदार धडकेमुळे कांचनजंगा एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले. या अपघातात ९ प्रवाशांचा मृत्यू, तर ४१ जण जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली. या मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर दोन्ही रेल्वेगाड्यांच्या चालकांना पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली टीए ९१२ ही लेखी परवानगी देण्यात आली होती. कांचनजंगा एक्स्प्रेस आगरतळाहून सियालदहला जात होती. पश्चिम बंगालमधील छत्तरहाट जंक्शन व राणीपतरा रेल्वे यांच्यादरम्यान सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास उभी असताना रेल्वेमार्गावर मागून आलेल्या मालगाडीने या प्रवासी गाडीला जोरदार धडक दिली. त्यामुळे कांचनजंगा एक्स्प्रेसचे दोन डबे तत्काळ रुळावरून घसरले, तर आणखी एक डबा मालगाडीच्या इंजिनाखाली अडकून लटकत होता.

मृतांमध्ये मालगाडीचा चालक व सहचालकाचाही समावेश आहे, तर काचनजंगा एक्स्प्रेसचा गार्ड जखमी झाला आहे. या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भागातील खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. त्याचे वृत्त कळताच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव तातडीने अपघातस्थळी रवाना झाले. त्यांनी तिथे चाललेल्या बचावकार्याची पाहणी केली. या अपघातामुळे पश्चिम बंगालच्या उत्तर भागातील रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.

मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी १० लाखांची मदत या अपघातात मरण पावलेल्यांच्या वारसदारांना प्रत्येकी १० लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी २.५ लाख रुपये व किरकोळ जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत देण्यात येईल, अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली.

मालगाडी चालकाने वेगाचा नियम मोडला

सिग्नल यंत्रणेत बिघाड झालेला असताना व पुढे जाण्यासाठी आवश्यक टीए ९१२ ही लेखी परवानगी दिली असतानाही रेल्वेचा वेग किती ठेवायचा याबद्दलच्या नियमांचे मालगाडीच्या चालकाने उल्लंघन केले असे रेल्वे बोडनि सोमवारी म्हटले आहे. मालगाडी किती वेगाने धावत होती याचा तपशील मात्र रेल्वे बोडनि दिलेला नाही.

रेल्वे प्रशासन चौकशी करणार

- कांचनजंगा एक्स्प्रेसला अपघात झाला, त्या रेल्वेमार्गावरील स्वयंचलित सिग्नल यंत्रणा सोमवारी पहाटे ५:५० वाजल्यापासून बिघाड झाला होता. त्यामुळे या दोन्ही गाड्यांना पुढे जाण्यासाठी हवी असलेली टीए ११२ ही परवानगी देण्यात आली होती.

- सिग्नलमध्ये बिघाड असेल व सर्वत्र लाल सिग्नल असेल तर अशा वेळी चालकाने ताशी १० किमीच्या वेगाने रेल्वेगाडी चालविणे व प्रत्येक सिग्नलजवळ ही गाडी एक मिनिट थांबविणे आवश्यक असते.

- मालगाडी, कांचनजंगा एक्स्प्रेसच्या चालकांनी हा नियम पाळला होता का याचीही आता रेल्वे प्रशासन चौकशी करणार आहे. दुःखदायक घटना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे की, कांचनजंगा एक्स्प्रेस व मालगाडीचा झालेला अपघात व त्यात झालेली जीवितहानी ही दुःखदायक घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, रेल्वे अपघाताची घटना वेदनादायी आहे. या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांचे मी सांत्वन करतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, कांचनजंगा एक्स्प्रेसला झालेला अपघात दुर्देवी आहे.

- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी या अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री व राज्यपाल यांनी अपघातस्थळी जाऊन तेथील स्थितीची पाहणी केली.

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघातwest bengalपश्चिम बंगाल