शहरं
Join us  
Trending Stories
1
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
2
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
3
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
4
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
5
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
6
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
7
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
8
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
9
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
10
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
11
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
12
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
13
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
14
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
15
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
16
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
17
ओमर अब्दुल्लांच्या सरकारपासून काँग्रेस चार हात लांब; महाराष्ट्र निवडणुकीशी कनेक्शन?
18
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका
19
T20 WC 24 : आम्ही कमी पडलो, तुमचं प्रेम, टीका यासाठी आभार; श्रेयांका पाटीलची प्रामाणिक कबुली
20
गायत्री शिंगणेंची बंडाची तयारी! शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही, तर...

गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये मोठा अपघात! विषारी वायूमुळे पाच कामगारांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 6:40 PM

गुजरातमधील कच्छ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, येथील एका केमिकल फॅक्टरीमध्ये विषारी वायूमुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील कांडला येथील एका केमिकल फॅक्टरीमध्ये विषारी वायू गळतीमुळे पाच कर्मचाऱ्यांचा मृ्त्यू झाला आहे. या फॅक्टरीमध्ये केमिकलची टाकी साफ करत असताना हा अपघात झाला आहे. ही घटना बुधवारी सकाळी झाली असून पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. 

मिळालेली माहिती अशी, येथील इमामी ॲग्रो प्लांटमध्ये एका सुपरवायझरसह पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. केमिकल टाकी साफ करत असताना हा अपघात झाला. कारखान्यातील रासायनिक टाक्या साफ करताना विषारी धुराच्या संपर्कात आल्याने कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृतांपैकी चार मजूर आहेत, तर एक पाटण जिल्ह्यातील रहिवासी आहे. बुधवारी सकाळी ते तेलाची टाकी साफ करत असताना हा अपघात झाला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

गुजरातमधील कांडला येथील इमामी ॲग्रोटेक प्लांटमध्ये खाद्यतेल, बायोडिझेल, रिफाइंड पाम, सोयाबीन तेल आणि वनस्पति तूप याचे उत्पादन केले जाते. याची उत्पादन क्षमता प्रतिदिन ३,२०० टन आहे. कच्छचे पोलिस अधीक्षक सागर बागमार यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी साडेबारा वाजता ॲग्रोटेक प्लांटमध्ये ही घटना घडली. अपघाताच्या वेळी कामगार साफसफाई करत होते.

मिळालेली माहिती अशी, एक कर्मचारी गाळ काढण्यासाठी टाकीत उतरला होता यानंतर तो बेशुद्ध झाला. त्याला वाचवण्यासाठी अन्य दोन कर्मचारी टाकीत उटरले तेव्हा तेही बेशुद्ध पडले. यानंतर आणखी दोन कर्मचारी त्यात उटरले यात पाचही जणांचा मृत्यू झाला. सिद्धार्थ तिवारी, अजमत खान, आशिष गुप्ता, आशिष कुमार आणि संजय ठाकूर अशी मृतांची नावे आहेत.

इमामी ॲग्रोटेक लिमिटेडचे ​​प्लांट हेड मणिक पाल यांनी सांगितले की, रात्री १२.३० च्या सुमारास काही लोक टाकीत बेशुद्ध पडल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यांना वाचवताना चार जणांना जीव गमवावा लागला. ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. तपास सुरू आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

कारखान्यात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना लगेच रुग्णालयात दाखल केले. तेथे पाचही जणांना मृत घोषित करण्यात आले. 

टॅग्स :Gujaratगुजरात