शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय बापू, किती खोके?" ५ कोटी सापडल्यावर राऊतांचा आरोप, शहाजीबापू म्हणाले, "माझं नाव नाही"
2
लॉरेंस बिश्नोईचा एनकाउंटर करणाऱ्याला 1,11,11,111 रुपयांचे बक्षीस...! कुणी केली घोषणा? उडाली खळबळ
3
लॉरेन्स बिश्नोई आता विधानसभा निवडणूक लढवणार? कोणी दिली राजकारणात येण्याची ऑफर?
4
नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, हदगावमध्ये केंद्रबिंदू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
5
"रुग्णालयाखाली बंकर, लाखो डॉलर्सची रोकड आणि सोनं लपवतंय हिजबुल्लाह", IDF चा मोठा दावा
6
BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा?
7
रतन टाटांच्या 'त्या' बहिणी कोण, ज्या पूर्ण करणार त्यांची अंतिम इच्छा? प्रकाशझोतापासून आहेत दूर
8
अनिल कपूरने नाकारली कोटींची ऑफर, पान मसालाची जाहिरात करण्यास दिला नकार
9
मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?
10
Share Market : शेअर बाजार सपोर्ट लेव्हलवर, दिवाळीपूर्वी होऊ शकते घसरण; अपर लेव्हलवर सेलर्स सक्रिय
11
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
12
Diwali 2024: 'या' वेळेत तळण  करा, पदार्थ तेल कमी पितील; जाणून घ्या त्यामागील शास्त्र!
13
१७० खोल्यांचं घर, ₹२०००० कोटींची संपत्ती; कोण आहेत जगातील सर्वात मोठ्या घराचे मालक समरजीतसिंह गायकवाड
14
मिका सिंगने कॉन्सर्टदरम्यान सलमानला धमकी देणाऱ्यांची केली बोलती बंद! म्हणाला- "भाई तू..."
15
शशांक केतकरच्या तक्रारीची BMC ने घेतली दखल! काहीच तासांत केली उपाययोजना; नेमकं प्रकरण काय?
16
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
17
मनसेला महायुतीचा पाठिंबा मिळण्याची चर्चा; मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सारेच प्रयत्नशील
18
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
19
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
20
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई

डोक्याला ताप देऊ नका, मी सुटीवर आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2023 9:29 AM

सुटीच्या दिवशीही बॉस काम सांगत असेल, ‘त्रास’ देत असेल तर? भारतातील ‘ड्रीम इलेव्हन’ कंपनीने अशा बॉसला एक लाख रुपयांचा दंड करण्याचा इशारा दिला आहे!

- पवन देशपांडे

आपली सुटी आहे आणि त्या दिवशीही जर आपल्या कोणत्या सहकाऱ्याने किंवा बॉसने फोन करून, मेसेज करून किंवा मेल करून काम सांगितले तर?.. वैताग वैताग आणि वैताग... याशिवाय काहीच नाही.

कोरोनामुळे जगात कामांच्या तासांचे आणि स्वरूपाचे सर्व ठोकताळेच बदलले आहेत. कोरोना काळाच्या आधी सारेच कसे कार्यालयीन वेळेत जेवढे काम शक्य आहे तेवढे पूर्ण करायचे. उर्वरित काम सुटीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑफिसमध्ये जाऊनच व्हायचे. पण गेल्या दोन वर्षांत वर्क फ्रॉम होमचा जो ट्रेंड आलाय त्याने २४ बाय ७ अशी कामाची व्याख्या झाली आहे. म्हणजे तुम्ही घरून काम करत असाल तर केव्हाही तुम्ही कामासाठी उपलब्ध असायला हवे, असा ट्रेंड रुजायला सुरुवात झाली.

कंपन्यांनाही हे फावले. कारण कर्मचारी घरून काम करणार म्हणजे ऑफिसचा इतर खर्च आपोआपच कमी झाला. त्यातून मग कोरोना गेला तरी आणि लॉकडाउन संपले तरी वर्क फ्रॉम होमचा ट्रेंड कायम आहे. ३० ते ४० टक्के कर्मचारी हल्ली घरूनच काम करत आहेत. त्यामुळे ते कधीही केव्हाही उपलब्ध असतील असा एक समज निर्माण झाला आहे. बरं घरून आणि हवे त्या ठिकाणाहून काम करता येत असल्याने कर्मचारीही फारसे त्याविरोधात आवाज उठवायच्या भानगडीत पडत नाहीत. पडल्याचे दिसलेही नाही. न्यू नॉर्मलने दिलेल्या या देणगीत आणखी एका नव्या नियमाची भर पडू पाहात आहे. ती म्हणजे सुटीच्या दिवशी त्रास द्यायचा नाही.

भारतातील ‘ड्रीम इलेव्हन’ या कंपनीने नुकतीच यासंदर्भात घोषणा केली आहे. सुटीवर असलेल्या कर्मचाऱ्यास कामावर असलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीने संपर्क करायचा नाही. केल्यास १ लाख रुपयांचा दंड केला जाईल, असा इशाराही कंपनीने दिला आहे. ‘ड्रीम इलेव्हन अनप्लग’ असे या योजनेचे नाव आहे. कंपनीचे सीईओ हर्ष जैन आणि भावित सेठ यांनी याविषयी लिंक्ड इन या सोशल मीडिया साइटवर सविस्तर पोस्टही केली आहे. त्यात ते म्हणतात, सुटीच्या दिवशी आपल्या कुटुंबाला वेळ देणे किंवा आराम करणे यामुळे एकूणच कामावर सकारात्मक परिणाम होत असतो. सुटी संपल्यानंतर काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा मूड चांगला राहतो, परिणामी अशा कर्मचाऱ्यांची काम करण्याची क्षमता वाढते आणि अप्रत्यक्षपणे त्याचा कंपनीला फायदा होतो.

या निर्णयामागे आणखीही एक मोठा विचार आहे. एखादा कर्मचारी सुटीच्या दिवशीही नेहमी काम करत असेल तर काही काळानंतर त्याच्या मनात कंपनीबद्दल नकारात्मक भावना निर्माण होते. सुटीच्या दिवशीही काम करायचे तर मग सुटी देता तरी कशाला, असा विचारही सुरू होतो. त्यातून मग नव्या जॉबचा शोध सुरू होतो. चांगले टॅलेंट बाहेर पडायला सुरुवात होते. हे जर होऊ द्यायचे नसेल तर कंपन्यांना काही धोरण आखणं गरजेचं आहे. २०२३ हे वर्ष असेच नवनवे धोरण घेऊन येणारे ठरणार आहे. त्यातला हा पहिला ट्रेंड असू शकतो की, टॅलेंट टिकवून ठेवायचे असेल तर त्यांच्या हक्काच्या सुटीच्या काळात त्यांना डिस्टर्ब करू नये.

गेल्या वर्षी एका सोशल मीडिया कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार ५४ टक्के लोक सुटीच्या दिवशीही कामापासून दूर राहू शकत नव्हते. पण यामुळे काही कर्मचारी नाराजही होत असल्याचे आढळले होते. अशा लोकांचा कंपनी बदलण्याचा कलही वाढू लागला होता. म्हणूनच आयटी सेक्टरमध्ये कर्मचारी मोठ्या प्रमाणात कंपन्या बदलत होते. हायब्रिड वर्क कल्चर हाही अशाच एका धोरणाचा भाग आहे. चांगले कर्मचारी टिकवून ठेवण्यासाठी कंपन्या आता आठवड्यातील एखादा दिवस वर्क फ्रॉम होमचीही परवानगी देत आहेत. २०२३ हे वर्ष अशा नवनव्या वर्क कल्चरच्या ट्रेंडने भरलेले असणार आहे. ‘अनप्लगिंग’ हा त्याचा पहिला भाग आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारी