शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पक्षात एका रात्रीतून फूट पडत नाही; शरद पवार गटाकडून आक्रमक युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 10:25 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाविषयी आज निवडणूक आयोगापुढे झालेली पाचवी सुनावणी दोन तास चालली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचा दावा अजित पवार गटाने एका रात्रीतून केला. निवडणूक आयोगाकडे ३० जून २०२३ रोजी याचिका दाखल करण्यापूर्वी हा वाद अस्तित्वातच नव्हता, असा आक्रमक युक्तिवाद आज शरद पवार गटाच्या वतीने निवडणूक आयोगापुढे केला. शरद पवार गटाचा युक्तिवाद बुधवारी, २९ नोव्हेंबर रोजी पूर्ण होईल आणि गुरुवारपासून अजित पवार गटाकडून माजी अटर्नी जनरल मुकुल रोहतगी युक्तिवाद सुरू करतील.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाविषयी आज निवडणूक आयोगापुढे झालेली पाचवी सुनावणी दोन तास चालली. सन १९७८ सालच्या ब्रह्मानंद रेड्डीविरुद्ध इंदिरा गांधी प्रकरणाचा दाखला देत अनुच्छेद १५ अंतर्गत पक्षफुटीसाठी पूर्वीपासून वाद असायला हवा; पण ३० जून २०२३ रोजी निवडणूक आयोगापुढे याचिका दाखल करून अजित पवार गटाला  पक्षात फूट पडल्याचा वाद अचानक उभा करता येणार नाही. हा वाद याचिका दाखल करण्याच्या खूप आधीपासून असायला हवा. हा निवडणूक आयोगाची दिशाभूल आणि भ्रमित करण्याचा  प्रयत्न आहे, असा युक्तिवाद शरद पवार गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ देवदत्त कामत यांनी केला. शरद पवार गटाला केवळ विलंब लावण्यातच स्वारस्य आहे, अशी टीकावजा नाराजी रोहतगी यांनी व्यक्त केली. आज दोन तासांच्या युक्तिवादात तेच ते मुद्दे मांडण्याचा प्रयत्न झाला, अशी टीका खासदार सुनील तटकरे यांनी केली. 

 १९९९ पासून २०१८ पर्यंत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा केला. जी निवडणूक २०१८ साली झाली आणि त्यानंतर स्थानिक पातळीवर २०२० ते २२ दरम्यान झालेल्या निवडणुका आणि राष्ट्रीय अधिवेशन चुकीचे असल्याचा आरोप प्रथमच २०२३ मध्ये करण्यात आला.  हा आरोप करणारे अजित पवार, प्रफुल्ल पटेल आहेत. ज्यांनी स्वत:च्या स्वाक्षरीने पत्र काढून राष्ट्रीय अधिवेशन बोलावले. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली तेव्हा पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांच्या नावाचा प्रस्ताव आणि अनुमोदन अजित पवार यांनी केले. त्यानंतर अचानक ३० जून २०२३ रोजी निवडणूक आयोगापुढे याचिका दाखल करून पक्षात फूट पडल्याचा दावा करण्यात आला. अनुच्छेद १५ नुसार निवडणूक चिन्हाशी संबंधित कोणताही वाद एका रात्रीतून नव्हे तर आधीपासून व्हायला हवा. 

 ३० जूनपूर्वी पक्षफुटीचा मुद्दा कधीच उपस्थित झाला नसल्याचे सर्व दस्तावेज, वक्तव्य आणि प्रतिज्ञापत्रात स्पष्टपणे नमूद आहे. उलट अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तोपर्यंत शरद पवार यांना शंभर टक्के समर्थन दिले होते. याचा अर्थ याचिका दाखल केली त्या तारखेपर्यंत कोणताही वाद नव्हता.  पूर्वविदित वाद नसताना अनुच्छेद १५ अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला कसा मिळेल, असा प्रश्न कामत यांनी उपस्थित केला.   

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस