शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

भारत सरकारच्या एका निर्णयानं ३ देशांची चिंता वाढली; जागतिक बाजारपेठेतही गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 17:35 IST

भारतात किरकोळ महागाई दराने गेल्या १५ महिन्यात उच्चांक गाठला आहे. त्यासाठी मोदी सरकारने किंमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्यातबंदीसह अनेक उपाय केले आहेत.

नवी दिल्ली – तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या भारताने बिगर बासमती तांदळावर निर्यातबंदी आणल्याने तांदळाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या दराने अनेक देशांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. जगातील अनेक देश तांदळासाठी भारतावर निर्भर आहेत. तांदळावरील निर्यातबंदी उठवावी अशी मागणी या देशांनी भारताकडे केली आहे. सिंगापूर, इंडोनेशिया, फिलिपिंस या देशांनी तांदळाच्या वाढत्या किंमती पाहून भारताकडे निर्यातबंदी उठवण्याचं आवाहन केले आहे.

मिंट रिपोर्टनुसार, सिंगापूरने भारताकडे ११०००० टन तांदळाची निर्यात करण्याची विनंती केली आहे. जूनमध्ये इंडोनेशियाने अल निनोच्या पार्श्वभूमीवर देशातील अन्नपुरवठा कायम ठेवण्यासाठी भारतातून दहा लाख टन तांदूळ आयात करण्याची घोषणा केली होती. अल निनोमुळे हवामान चक्र विस्कळीत होऊन पूर, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्ती उद्भवतात. त्याचबरोबर फिलीपिन्सही तांदूळ पुरवठ्यासाठी भारतावर अवलंबून आहे.

अलीकडेच संयुक्त राष्ट्र जागतिक खाद्य कार्यक्रमाअंतर्गत भारताकडे २ लाख टन तांदळाची मागणी करण्यात आली होती. कोविड १९ आणि युक्रेन युद्धामुळे खाद्य पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यात भारताने तांदूळ निर्यातबंदी निर्णय घेतल्याने खाद्य असुरक्षा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भारताचा शेजारी देश बांगलादेशही तांदळासह काही कृषी उत्पादनांच्या पुरवठ्यासाठी भारताशी बोलणी करत आहे. भारतात किरकोळ महागाई दराने गेल्या १५ महिन्यात उच्चांक गाठला आहे. त्यासाठी मोदी सरकारने किंमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्यातबंदीसह अनेक उपाय केले आहेत.

पुढील लोकसभा निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकार किंमतीवर नियंत्रण लावण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहे. महागाई कमी करू असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले होते. नुकतेच सिंगापूरने तांदूळ निर्यातीबाबत आम्ही भारत सरकारशी चर्चा करत आहोत असं म्हटलं. सिंगापूरमध्ये ३० देशातून तांदूळ आयात केला जातो. त्यात २०२२ मध्ये भारतातून आयात केलेल्या तांदळाचे योगदान ४० टक्के इतके होते. निर्यातबंदीमुळे बिगर बासमती तांदळाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सिंगापूरमध्ये बिगर बासमती तांदूळ जवळपास १७ टक्के आयात केला जातो.

शेजारील देशांची चिंता वाढली

भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. जागतिक व्यापारात भारताचा ४० टक्के हिस्सा आहे. भारत सरकारने २० जुलैरोजी बिगर बासमती तांदूळ निर्यातीवर बंदी आणली. घरगुती किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. तांदूळ निर्यातीवर निर्बंध आणल्याने जागतिक बाजारपेठेत तांदळाच्या किंमतीवर परिणाम झाला. बांगलादेश, नेपाळसह भारताचे शेजारील देश तांदळासाठी भारतावर निर्भर आहेत. त्यामुळे या देशांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार