शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

भारताविरोधातील पाऊल खपवून घेणार नाही;संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 12:04 PM

भारताच्या अणुचाचण्यांनी जगाला संदेश दिला की आपण शांतताप्रिय राष्ट्र असलो तरी नालंदा पुन्हा जळताना दिसणार नाही.

नवी दिल्ली : १९९८ मध्ये देशाच्या अणुचाचण्यांनी जगाला संदेश दिला की, भारत हा शांतताप्रिय देश असला तरी स्वाभिमानाविरुद्ध उचलण्यात आलेले कोणतेही पाऊल तो खपवून घेणार नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी येथे सांगितले.

येथे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आयोजित सोहळ्याला संबोधित करताना सिंह म्हणाले की, बाह्य आक्रमणकर्त्यांनी  नालंदा येथील शैक्षणिक केंद्र व सोमनाथ येथील सांस्कृतिक प्रतीकाचा विध्वंस केल्यानंतर भारताने इतिहासापासून धडा घेतला. १९९८ च्या पोखरण-२ अणुचाचणीच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते.

शांत असलो तरीही...

भारताच्या अणुचाचण्यांनी जगाला संदेश दिला की आपण शांतताप्रिय राष्ट्र असलो तरी नालंदा पुन्हा जळताना दिसणार नाही. सोमनाथसारख्या सांस्कृतिक प्रतीकाचा विध्वंस आम्ही सहन करणार नाही. आम्ही आमच्या स्वाभिमानाच्या विरोधात उचललेल्या प्रत्येक पावलाला चोख प्रत्युत्तर देऊ,’ असेही सिंह म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी पोखरण येथील अणुचाचणी भारताच्या इतिहासातील सर्वात अभिमानास्पद क्षण असल्याचे म्हटले. तंत्रज्ञान वर्चस्व गाजवण्याचे नव्हे तर प्रगतीला वेग देण्याचे साधन असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह. 

मोदींनी केली तुलना

१० वर्षांपूर्वी प्रत्येकवर्षी सुमारे ४००० पेटंट नोंदणीकृत होते, परंतु आता ही संख्या ३०,००० पेक्षा जास्त आहे.२०१४ मध्ये देशात सुमारे १०० स्टार्टअप होते, आज त्यांची संख्या एक लाखाच्या जवळपास पोहोचली आहे.पूर्वी वार्षिक ७०,००० ट्रेडमार्क नोंदणीकृत होते, आता हा आकडा २.५ लाखांहून अधिक आहे.इन्क्युबेशन केंद्रांची संख्या २०१४ मधील १५० वरून ६५० पर्यंत वाढली आहे. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह