शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
4
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
5
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
6
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
7
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
8
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
9
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
10
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
11
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
12
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
13
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
14
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
15
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
16
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
17
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
18
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
19
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
20
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न

पीएनबीचे लॉकर खोलताच किंचाळली तरुणी; लाखो रुपयांची हालत अशी की, मातीच झाली....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 16:53 IST

सुनीता मेहता यांचे व त्यांच्या भावाचे पीएनबीच्या बँकेत लॉकर होते. दोघेही ते खोलण्यासाठी बँकेत गेले होते. गेल्या वर्षीच ते सुरु करण्यात आले होते. मे मध्ये त्यांनी हे पैसे लॉकरमध्ये ठेवले होते.

आजकाल बँकांमध्ये देखील आपला पैसा सुरक्षित राहिलेला नाहीय. एकतर कोणतरी घपला करतो, किंवा हॅकर काढून घेतोय. असे असताना आता बँकेच्या लॉकरमध्ये देखील ठेवलेले पैसे सुरक्षित राहतील याची खात्री नसणारा प्रकार समोर आला आहे. राजस्थानच्या उदयपूरमधील पीएनबी बँकेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

पीएनबी बँकेच्या लॉकरमध्ये ग्राहकाने ठेवलेल्या नोटांना वाळवीने खाऊन टाकले होते. जेव्हा ही ग्राहक तरुणी लॉकर खोलायला आली तेव्हा मातीचा गोळा पाहून किंचाळलीच. यानंतर बँकेचा मॅनजरही ते पाहून हादरला. लॉकरमध्ये ठेवलेले दोन लाख पंधरा हजार रुपये वाळवीने फस्त करून टाकले होते. 

सुनीता मेहता यांचे व त्यांच्या भावाचे पीएनबीच्या बँकेत लॉकर होते. दोघेही ते खोलण्यासाठी बँकेत गेले होते. गेल्या वर्षीच ते सुरु करण्यात आले होते. मे मध्ये त्यांनी हे पैसे लॉकरमध्ये ठेवले होते. आता गरज पडली तेव्हा ते त्या काढण्यासाठी गेल्या. परंतू लॉकर खोलताच मातीसारखी वस्तू दिसल्याने त्या हादरल्या. बँक मॅनेजमेंटने पेस्ट कंट्रोल केले नाही यामुळे नोटांचे नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

मेहता यांच्या भावाने सांगितले की, आम्ही दोघेही लॉकरमधील वस्तू नेण्यासाठी गेलो होतो. पहिले मी माझे लॉकर खोलले. जेव्हा ताईने तिचे लॉकर खोलले तेव्हा ती किंचालली. बंडलांच्या जागी वाळवी लागली होती. यामुळे बंडले अडकली होती. बँक कर्मचाऱ्यांनी स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने बंडले बाहेर काढली. १५ हजाराचे ५० रुपयांचे एक बंड पूर्णपणे कुरतडले गेले होते. दुसरे बाहेरून ठीक दिसत होते. त्या ५०० च्या नोटा होत्या. यामुळे बँक मॅनेजरने आम्हाला १५ हजाराच्या नोटा बदलून दिल्या. ते सर्व पैसे घेऊन आम्ही घरी गेलो तर उरलेल्या २ लाखांच्या नोटा देखील वाळवीने खाल्लेल्या दिसल्या. 

या नोटा घेऊन दुसऱ्या दिवशी आम्ही परत बँकेत गेलो. तेव्हा बँक मॅनेजरने त्या बदलून देण्यास नकार दिला. मात्र, आम्ही तिथे आरडाओरडा करताच त्याने त्या देखील बदलून दिल्या आहेत, असे मेहतांचा भाऊ म्हणाला. 

त्या बँकेत असे किमान 25 लॉकर असतील ज्यांना वाळवी लागलेली असेल. बँक कर्मचाऱ्यांनी वेळीच यावर तोडगा काढला असता, तर लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंपर्यंत वाळवी पोहोचली नसती. लोकांचे नुकसान झाले नसते, असे मेहता म्हणाल्या. आता बँक प्रशासनाने ज्यांची ज्यांची लॉकर आहेत त्यांना फोन करून लॉकर चेक करण्यास सांगितले आहे. 

टॅग्स :Punjab National Bankपंजाब नॅशनल बँक