शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

नोटबंदीबाबत 'आम आदमी' आमच्यासोबतच

By admin | Published: November 18, 2016 6:59 PM

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयावरून आम आदमी पक्ष सरकारवर टीका करत असला तरी देशातील खरा आम आदमी निर्णयावर नाराज नाही आहे.

 ऑनलाइन लोकमत

बंगळुरू, दि. 18 -  पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयावरून आम आदमी पक्ष  सरकारवर टीका करत असला तरी देशातील खरा आम आदमी निर्णयावर नाराज नाही आहे. तो आमच्यासोबतच आहे, असे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज सांगितले. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या नोटबंदीच्या निर्णयाविरोधात आम आदमी पक्षाने जोरदार आघाडी उघडली आहे. या प्रश्नावरून ते दररोज सरकावर नवनवे आरोप करत आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना व्यंकय्या नायडू यांनी हा टोला लगावला. "2014 च्या निवडणुकीत भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा होता. त्यामुळे सत्ता मिळाल्यावर सरकारने त्याविरोधात पावले उचलण्यास सुरुवात केली. त्यामुळे हा निर्णय काही अचानक घेतलेला नाही. नोटबंदीच्या सर्जरीची देशाला आवश्यकता होती. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला," असे नायडू म्हणाले. 
यावेळी परदेशातील काळा पैसा, तसेच सरकारकडून अंबानी, अदानीसारख्या उद्योजकांना मिळत असलेल्या झुकत्या मापाबाबतही ते बोलले. "परदेशात ठेवण्यात आलेला काळा पैसा हा मोदी सरकारच्या काळात ठेवण्यात आलेला नाही. तर तो त्याआधीच्या काळातील आहे. तसेच अंबानी, अदानी हे उद्योजक मोदींच्या कार्यकाळात उदयास आलेले नाहीत. तर हे उद्योजक ही याआधीच्या सरकारांची देणगी आहे." अशी माहिती त्यांनी दिली. नोटबंदीच्या निर्णयावरून विरोधी पक्ष राजकारण तापवत असतानाच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्यामुळे नायडू यांनी समाधान व्यक्त केले.