शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
3
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
4
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
5
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
6
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
7
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले
8
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
9
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
10
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
11
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
12
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
13
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात
14
IND vs BAN : रिषभमुळे रोहितने निर्णय बदलला; सिराजची मागणी फेटाळली; पंतने अखेर माफी मागितली
15
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
16
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
17
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
18
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
19
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
20
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 

‘अतुल्य भारत’मधून आमीर खान बाहेर

By admin | Published: January 07, 2016 2:06 AM

‘अतुल्य भारत’ मोहिमेचा चेहरा बनलेला अभिनेता आमीर खान यापुढे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर म्हणून दिसणार नाही, त्याचा करार संपला असल्याचा खुलासा सरकारने केला

नवी दिल्ली : ‘अतुल्य भारत’ मोहिमेचा चेहरा बनलेला अभिनेता आमीर खान यापुढे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर म्हणून दिसणार नाही, त्याचा करार संपला असल्याचा खुलासा सरकारने केला असला तरी अलीकडेच आमीरने केलेल्या वादग्रस्त विधानाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न होत आहे. पत्नी किरण राव हिने आपण देश सोडून जावे का? अशी विचारणा केल्याचे सांगत आमीरने देशात असहिष्णुता वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. देशातील असुरक्षित वातावरणात मुलांच्या सुरक्षेबाबत भीती वाटत असल्याची भावनाही त्याने व्यक्त केल्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.‘मॅककॅन वर्ल्डवाईड’ या संस्थेने आमीरशी ‘अतिथी देवो भव’ या जाहिरातीसाठी केलेला करार संपला आहे, त्यामुळेच आपसूकच संबंधित व्यवस्था संपुष्टात आली आहे. मंत्रालयाने त्याच्याशी करार केला नव्हता, असे पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी नमूद केले. आमीर अद्यापही पर्यटन मंत्रालयाचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर आहे काय? यावर त्यांनी निश्चितच नाही, असे उत्तर दिले. अतुल्य भारत मोहिमेचा एक भाग म्हणून ‘अतिथी देवो भव’ची जाहिरात केली जात होती. ही संपुआ सरकारच्या काळातील योजना होती. या मुद्यावर बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर आरटीआयअंतर्गत प्रश्न विचारण्यात आला असता मंत्रालयाने संदिग्ध निवेदन दिले होते.> आमीर खानबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्या तरी पर्यटन मंत्रालयात कोणताही बदल झालेला नाही. समाजजागृतीसाठी मोहिमेची जबाबदारी मॅककॅन वर्ल्डवाईडकडे सोपविण्यात आली आहे. या कंपनीने आमीरशी केलेला करार संपला आहे, असे मंत्रालयाने एका निवेदनात स्पष्ट केले.