शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

दिल्लीत आप, भाजप अन् काँग्रेसमध्ये सामना; राजकीय घडामोडींमुळे थंडीतही राजधानीचा उष्मांक वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 06:47 IST

दिल्लीतील कडाक्याच्या थंडीतही राजकीय घडामोडींमुळे देशाच्या राजधानीचा उष्मांक वाढला आहे.

- चंद्रशेखर बर्वेनवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा मुख्य सामना देशातील तीन राष्ट्रीय पक्षांमध्ये होणार असला, तरी आम आदमी पक्षाने सध्या प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीतील कडाक्याच्या थंडीतही राजकीय घडामोडींमुळे देशाच्या राजधानीचा उष्मांक वाढला आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सत्ताधारी आम आदमी पक्ष दिल्लीची सत्ता तिसऱ्यांदा मिळविण्यासाठी मैदानात उतरला आहे. तर, भारतीय जनता पक्षाने २७ वर्षांचा वनवास संपविण्यासाठी कंबर कसली आहे. कॉंग्रेसही मैदानात आहे. परंतु, फारशी सक्रियता दिसून येत नाही.

भारतीय जनता पक्ष मागील २७ वर्षांपासून दिल्लीच्या सिंहासनावर बसण्याची प्रतीक्षा करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संपूर्ण कॅबिनेट आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री भाजपचा प्रचार करण्यासाठी दिल्लीच्या मैदानात उतरणार आहे. गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपशासित राज्यांचे १२ मुख्यमंत्री निवडणुकीच्या प्रचारासाठी येणार आहेत. 

आम आदमी पक्षाने प्रचार कसा करायचा?, यावर कार्यकर्त्यांना ९० मिनिटांचे प्रशिक्षण दिली आहे. प्रत्येक बुथवर १५ ते २० कार्यकर्ते तैनात केले आहेत. बुथवरील मतदारांपर्यंत पोहचणे ही त्यांची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री आतिशी मर्लोना यांच्याशिवाय माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह खासदार व आमदारांच्या खांद्यावर वेगवेगळ्या मतदारसंघांची जबाबदारी टाकण्यात आली आहे. 

२०२० ची आकडेवारी २०२० मधील निवडणुकीत आम आदमी पक्षाला ५३.५७ टक्के मतांसह ६२ जागा मिळाल्या, तर भाजपला ८ जागांसह एकूण ३८.५१ टक्के मते मिळाली होती. काँग्रेसला ४.२६ टक्के मते मिळाली होती, परंतु एकही आमदार निवडून आला नव्हता. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकdelhiदिल्लीAAPआपBJPभाजपाcongressकाँग्रेस