शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

‘आप’ने राष्ट्रीय, प्रादेशिक पातळीवर आशावाद निर्माण केला आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 09:00 IST

‘आप’ची वैचारिक भूमिका त्यांच्या पाच वर्षांतील कामगिरीमधून घडविली गेली.

दिल्लीची ही निवडणूक वैचारिक संघर्षाचा एक महत्त्वाचा लढा होता. दिल्ली संपूर्ण भारताचे एक छोटे स्वरूप आहे. तेथे वैचारिक संघर्ष झाला. कल्पित राष्ट्रवाद आणि सामाजिक न्याय हा दोन प्रकारचा वैचारिक सत्तासंघर्ष आहे. भाजपचा प्रचार राष्ट्रवाद, भारत-पाक, हिंदू-मुस्लिम या मुद्द्यांवर केंद्रित झाला होता. हा एका अर्थाने कल्पित राष्ट्रवाद आहे. या राष्ट्रवादासंदर्भात ‘आप’ने धार्मिक अंतराय उभा राहू दिला नाही. त्यांनी धार्मिक अंतराय रोखला. विशेष म्हणजे, मोदी विरुद्ध केजरीवाल असा अंतराय उभा राहू दिला नाही. याचे दोन महत्त्वाचे अर्थ आहेत. एक, अंतरायापेक्षा समन्वय या गोष्टीला ‘आप’ने स्वीकारले. त्यांनी ‘सामाजिक सलोखा’ हा कळीचा समझोता निवडणूक क्षेत्रात घडविला. दोन, ‘आप’ने हिंदू अस्मिता सुस्पष्टपणे व्यक्त केली. त्यांनी बहुल पद्धतीची हिंदू अस्मिता व्यक्त केली. त्यामुळे मोदी-शहांची हिंदुत्व अस्मिता आणि हिंदू अस्मिता यांपैकी हिंदू अस्मितेकडे झुकता कल राहिला.

‘आप’ची वैचारिक भूमिका त्यांच्या पाच वर्षांतील कामगिरीमधून घडविली गेली. ‘आप’ने शाळा, रस्ते, वीज अशी विकासोन्मुख भूमिका घेतली होती. याबरोबर निवडणूक काळात त्यांनी नेतृत्वापेक्षा विकास हा विचार मध्यवर्ती ठेवला. ‘आप’ने धार्मिक अंतराय हा मुद्दा बाजूला ठेवला. यामुळे ही सर्व राजकीय प्रक्रिया सामाजिक न्यायाच्या चौकटीत ‘आप’ने घडवून आणली, असा युक्तिवाद केला जातो. यामध्ये तथ्य आहे. त्यामुळे भाजपला त्यांचे डावपेच बदलण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी मोदींचे नेतृत्व आणि विधानसभेसाठी केजरीवालांचे नेतृत्व हा नेतृत्वकेंद्री विचार होता. या दोन्ही नेतृत्वांमध्ये फरक आहे. केजरीवाल विकासाधारित आणि मोदी हिंदुत्वाधारित राजकारण घडवीत आहेत. अशा दोन भिन्न टोकांच्या राजकारणाचे समर्थन दिल्लीमध्ये केले गेले. त्यामुळे एकवेळ सारासार विवेक आणि दुसऱ्या वेळी हिंदुत्व असे मतदारांचे दुहेरी स्वरूप असते. अशी मतदारांची दुहेरी जीवनपद्धती लोकशाहीविरोधी ठरते. त्यामुळे अशा प्रकारच्या मतदारांच्या वर्तनाला नैतिक व लोकशाही समर्थक असे कितपत म्हणता येईल, हा प्रश्न उपस्थित होतो. मतदार वर्गाच्या संदर्भात नैतिकचा मुद्दा शिल्लक राहतो. यामुळे ही निवडणूक भाजपचा पराभव म्हणून जास्त महत्त्वाची आहे. त्यापेक्षा मतदारांचे नैतिक, राजकीय चारित्र्य, आक्रमक राष्ट्रवाद, विकासवाद अशा चौकटीमध्ये मुक्त संचार करते असे दिसते; म्हणून ते जास्त चिंताजनक आहे. मतदारराजा अशी त्यांची प्रतिमा असली, तरी मतदार राजाची मुक्ती ढोंगीपणा आणि बेबनाव या गोष्टींपासून होत नाही. या अर्थाने मतदार राजा एका नवीन साटेलोटे चळवळीत अडकला आहे. साटेलोटे चळवळीचा तो कार्यकर्ता व नेता झाला आहे. अशा चळवळीपासून त्याने फरकत घेतली, तरच तो पर्यायी राजकारणाचा विचार करतो, असे म्हणता येईल. या क्षेत्रात राजकीय पक्ष फार काम करीत नाहीत. निवडणुकीतील यश-अपयशाच्या आधारे मतदार राजाचे गौरवीकरण आणि विकृतीकरण करणाऱ्या प्रवृत्ती आहेत. तरीही ‘आप’ने विकासाचे राजकारण करणारा कार्यकर्ता घडविला. त्यांनी विकासाचे एक प्रारूप विकसित केले. त्याबद्दल सत्ताधारी वर्ग सकारात्मक भाष्य करतो. त्यामुळे ‘आप’च्या निवडणुकीय राजकारणाला मर्यादा राहूनदेखील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर एक आशावाद निर्माण झाला.भाजपला आश्वासनांमुळे पत्करावी लागली हारआता नजीकच्या काळात बिहारमध्ये निवडणूक आहे. ती जिंकण्यासाठी भाजपाने धर्म आधारित भावनिक राष्ट्रवाद, देशभक्ती, हिंदू- मुस्लिम अशा धृवीकरणाचे राजकारण केले. दिल्लीत याचा उपयोग झालाच नाही. दिल्लीत विकासकामांवर आधारित मते देण्यात आली. अशा परिस्थितीत केजरीवाल यांनी आपली कामे दाखवून दिल्लीत निवडणूक जिंकली. जनतेने भाजपला पूर्णपणे नाकारले. आता नितीशकुमार, पासवान आणि लालूप्रसाद जनतेच्या मागण्यांना कसे सामोरे जातील, त्यावर भाजप आपली चाल बदलेल. भाजप नेते निवडणुकीच्या काळात बेधडक विधाने करतात. जावडेकरांनी विधान केले की, केजरीवाल दहशतवादी आहे. यावरून त्यांना यू टर्न घ्यावा लागला. लोकांची दिशाभूल केली जाते. विधाने मागे घेणे असे प्रकार केले जातात. ते सर्व जनतेसमोर उघडे पडले. भाजपचा दुट्टपी चेहरा जनतेसमोर पोहोचला. विकासाच्या विरुद्ध भावनिक मुद्दे अशी लढाई कधी झाली नव्हती. त्यामुळे जनतेला हा निर्णय घेता आला. पुढच्या राजकारणात दिल्लीचा प्रभाव सर्वत्र पडणार आहे. महाराष्ट्रातही शाळांचा दर्जा सुधारणे, दोनशे युनिट वीज मोफत, अशा नागरिकांच्या मागण्या जोर धरत आहेत. त्या पुढे आल्या तर भावनिक मुद्दे बाजूला पडतील. दिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेस हा सतत पर्याय म्हणूनच उभा राहिला. त्यांना विश्वासार्हता टिकवता आली नाही. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने नुसती आश्वासने दिली.

- मुकुंद किर्दत, आम आदमी पार्टीचे पुणे शहराध्यक्ष‘आप’चे यश विकासकामांमुळेच

दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात ‘आप’ने वीज, पाणी, निवारा व शिक्षण या मुद्यांवरच भर दिला. महत्त्वाचे म्हणजे शिक्षणक्षेत्र हा देखील प्रचाराचा प्रमुख मुद्दा होऊ शकतो, हे केजरीवाल यांनी दाखवून दिले. भाजपला हा निकाल नक्कीच विचार करायला लावणारा आहे. ज्याप्रकारे भाजपच्या हातातून एकेक राज्य निसटून चालले आहे, त्यानुसार २०२२ ची राष्ट्रपती निवडणूक भाजपासाठी एकतर्फी होईल असे वाटत नाही. प्रमुख प्रतिस्पर्ध्याला हरवण्यासाठी आपण शुन्यावर बाद होऊन इतरांच्या विजयामध्ये आनंदोत्स साजरा करायचा हे काँग्रेसचे धोरण त्यांना हानिकारक ठरू शकते.

- अजय अंधारे,तीर्थपुरी, ता. घनसावंगी, जि. जालना

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीAAPआपdelhi electionदिल्ली निवडणूक