शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

‘आप’ने जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला!

By admin | Published: January 31, 2015 11:53 PM

आम आदमी पार्टीने जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. दिल्लीतील जनतेने अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला पुन्हा सत्तेवर बसविण्याची घोडचूक करू नये,

मोदींची टीका : दिल्ली विधानसभेचा प्रचार शिगेला, आपचाही भाजपवर हल्लाबोलनवी दिल्ली : आम आदमी पार्टीने जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. दिल्लीतील जनतेने अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला पुन्हा सत्तेवर बसविण्याची घोडचूक करू नये, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘आप’वर हल्लाबोल केला.येथे एका निवडणूक प्रचार सभेत बोलताना मोदी म्हणाले, एक वर्षापूर्वी ज्या लोकांनी स्वप्न दाखविले होते, त्याच लोकांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. तुमची स्वप्ने धुळीस मिळविली. दिल्लीकरांनी लोकसभा निवडणुकीत दिल्लीला उद्ध्वस्त करणाऱ्यांना क्षमा केली नाही. आता विधानसभा निवडणुकीतही दिल्लीची वाट लावणाऱ्यांना दिल्लीची जनता पसंत करणार नाही.‘आप’ किंवा त्या पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा नामोल्लेख न करता मोदी पुढे म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षाच्या सर्वाधिक उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली, त्या पक्षाला तुम्ही चांगल्याप्रकारे ओळखून आहात. असे असतानाही तो पक्ष आता लोकांना संभ्रमित करण्याची कोणतीही कसर बाकी ठेवताना दिसत नाही. एखादवेळी खोटे बोलले तर चालते; परंतु नेहमी-नेहमी लोकांच्या डोळ्यात धूळफेक करून यश प्राप्त करता येत नाही.किरण बेदी यांच्या नेतृत्वात भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून देण्याचे आवाहन मोदी यांनी केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)करून मोदी म्हणाले, दिल्लीतील वर्षभराचे ‘बुरे दिन’ आता संपलेले आहेत. काही लोकांनी गेले एक वर्ष वाया घालविण्याचेच काम केले. स्पष्ट बहुमताचे सरकार द्या. दिल्लीदेखील विकासाच्या मार्गावर पुढे गेल्याशिवाय राहणार नाही.(लोकमत न्यूज नेटवर्क)४दिल्लीतील प्रत्येक घटनेचा संपूर्ण भारतावर प्रभाव पडत असतो. साऱ्या जगात आम्ही दिल्लीला कोणत्या रूपात सादर करतो, हे लक्षात घेऊन या निवडणुकीकडे पाहिले पाहिजे. मी दिल्लीला समस्यामुक्त करण्यासाठी आलो आहे. मला केवळ साऊथ ब्लॉकमध्येच बसू देऊ नका. दिल्लीच्या गल्लीबोळातही काम करण्याची संधी द्या, असे मोदी यावेळी म्हणाले.भाजपच्या प्रश्नपंचकाकडे आपने फिरविली पाठभाजपने आम आदमी पार्टीला दररोज पाच प्रश्न विचारण्याचा सपाटा लावला असतानाच, आम्ही या प्रश्नांची उत्तरे देणार नाही, असे आपने स्पष्ट केले आहे़ भाजप आम्हाला जाहीर व्यासपीठावरून प्रश्न विचारू शकत होती; पण आम्ही दिलेल्या जाहीर खुल्या चर्चेचे आव्हान नाकारून त्यांनी पळ काढला आहे, अशी बोचरी टीका आप नेते आशुतोष यांनी शनिवारी केली़ पाच हजारांवर मद्याच्या बाटल्या जप्तआपचे उत्तमनगरचे उमेदवार नरेश बलियान यांच्या कथित मालकीच्या गोदामातून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री ५ हजार ९६४ मद्याच्या बाटल्या जप्त केल्या़ आयोगाच्या अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली़ शुक्रवारी रात्री उशिरा आयोगाचे भरारी पथक आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवीत ही कारवाई केली़ गोदामातून हरियाणा निर्मिती मद्याच्या ५ हजार ९६४ बाटल्या म्हणजे सुमारे ४,४७३ लिटर मद्य यावेळी जप्त करण्यात आले़ प्राथमिक चौकशीअंती, उत्तमनगर भागातील हे गोदाम आम आदमी पार्टीचे उमेदवार नरेश बलियान यांच्याशी संबंधित असल्याचे समोर आलेले आहे; मात्र या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही़ यासंदर्भात उत्तमनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे़ बेदींची कुमार विश्वास यांच्या विरोधात तक्रारभाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या दिल्लीतील उमेदवार किरण बेदी यांनी आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांच्या विरोधात असभ्य वक्तव्य केल्याचा आरोप लावत, पोलिसांत तक्रार दाखल केली आहे़ भाजपनेही या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे़ ...तर राजकारण सोडेन- कुमार विश्वासमी कुठलेही आक्षेपार्ह वक्तव्य केलेले नाही़ भाजपची ‘आॅनलाईन’ वाहिनी अशा प्रकारच्या अफवा पसरवीत आहे़ मी बेदी आणि भाजपला आव्हान देतो, आरोप सिद्ध करून दाखवावेत़ आरोप सिद्ध केल्यास मी राजकारण सोडेन, अन्यथा बेदींनी सोडावे, असे कुमार विश्वास म्हणाले़