शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समिकरणं बदलणार? 
2
'हा' नेता ठाकरेंचं शिवबंधन तोडणार! अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार?
3
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
4
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
5
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; दिवाळीपूर्वीच सोन्याला पुन्हा झळाळी
6
खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
7
हिंद महासागरात चक्रव्यूह...! भारताची पकड आणखी मजबूत होणार; चीनला देणार टक्कर
8
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
9
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
10
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
11
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
12
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
13
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान
14
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
15
PAK vs ENG : हे फक्त पाकिस्तानात होऊ शकतं! दारुण पराभवानंतर PCB मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
16
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
17
पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं
18
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
19
अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी
20
AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती

Arvind Kejriwal: "सुधरा नाहीतर...!", अरविंद केजरीवालांनी पाकिस्तानला थेट जागाच दाखवली; काश्मीरबाबत केलं मोठं विधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2022 4:05 PM

AAP Jan Akrosh Rally in Delhi: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून होणाऱ्या 'टार्गेट किलिंग' प्रकरणाच्या निषेधार्थ आम आदमी पक्षानं आज जन आक्रोश रॅलीचं आयोजन दिल्लीत केलं होतं.

AAP Jan Akrosh Rally in Delhi: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून होणाऱ्या 'टार्गेट किलिंग' प्रकरणाच्या निषेधार्थ आम आदमी पक्षानं आज जन आक्रोश रॅलीचं आयोजन दिल्लीत केलं होतं. या रॅलीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकार तसंच पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. "गेल्या काही महिन्यांमध्ये काश्मीरमध्ये एकूण १८ नागरिकांची हत्या झाली आहे. ज्या लोकांना पोलीस सुरक्षा देण्यात आली होती अशाही लोकांना ठार मारण्यात आलं. काश्मीर दहशतीच्या आगीत जळत आहे, तर भाजपा राजकारणात व्यग्र आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा पूर्णपणे फोल ठरली आहे", असं केजरीवाल म्हणाले. 

काश्मीरी पंडितांना आवश्यक सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी केजरीवालांनी मोदी सरकारकडे केली आहे. गेल्या काही आठवठ्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मीरी पंडितांना लक्ष्य केलं जात आहे. यावरुन विविध राजकीय पक्षांनी भाजपावर निशाणा साधला आहे. घडलेल्या घटनांना जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला आहे. 

"जेव्हा भाजपा सत्तेत आली तेव्हा काश्मीर दहशतवादाच्या आगीत जळू लागला. भाजपाला फक्त घाणेरडं राजकारण करता येतं. यांना भारतीयांशी कोणतंही घेणं देणं नाही. संपूर्ण देशात घाणेरडं राजकारण सुरू आहे. ४५०० काश्मीरी पंडितांचं पीएम रिलीफ फंडच्या माध्यमातून पूनर्वसन करण्यात आलं. तुम्ही त्यांना आज इतर कोणत्या राज्यात जाण्यापासून रोखलं आहे. १७७ काश्मीरींना यांनीच जम्मू-काश्मीरमध्ये ठेवलं आहे आणि त्यांची बदली केली नाही. ज्याचे परिणाम आज सर्वांसमोर आहेत", असं केजरीवाल म्हणाले. 

पाकिस्तानला दाखवली जागाजन आक्रोश रॅलीच्या व्यासपीठावरुन केजरीवाल यांनी थेट पाकिस्तानला आव्हान दिलं. पाकिस्तानला आव्हान देताना केजरीवाल म्हणाले की,"सुधरा, नाहीतर भारतानं जर ठरवलं तर पाकिस्तान वाचणार नाही. काश्मीर भारताचा भाग होता, आहे आणि कायम राहणार आहे. या विषयावर लवकरच गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही भेट घेऊन बोलणार आहे", असं केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपJammu Kashmirजम्मू-काश्मीर