शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: रतन टाटांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत दाखल, थोड्या वेळात अंत्यसंस्कार
2
मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, खासगी विद्यापीठांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका
3
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
4
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
5
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
6
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
7
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
8
इंग्लंड-पाक नव्हे भारत-श्रीलंका लढतीत सेट झालाय कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड
9
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
10
Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान!
11
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा
12
एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल  
13
टाटांची जादू : टाटांच्या 'या' शेअरनं १ लाखांचे केले ₹३५ कोटी; गुंतवणूकदार झाले कोट्यधीश
14
सर्वाधिक १० श्रीमंत उमेदवारांमध्ये ७ पुरुष, ३ महिला; सर्व पुरुष हरले, महिला जिंकल्या
15
Riyan Parag ची नौटंकी; अजब-गजब ॲक्शन अन् पंचांकडून थेट कारवाईची रिॲक्शन (VIDEO)
16
Jio नव्हे, रतन टाटांनी दूरसंचार क्षेत्र बदलले; कॉलसह इंटरनेट स्वस्त केले
17
कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते
18
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
19
एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!
20
भयंकर! बायकोला मिळालेल्या योजनेच्या पैशातून नवरा प्यायला दारू अन् उचललं टोकाचं पाऊल

‘आप’ आमदारांना अरविंद केजरीवाल यांचा ‘कानमंत्र’; “काहीही सहन करेन, पण...”

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 2:49 PM

लोकांना आपल्याकडून अपेक्षा आहेत. ३ दिवसांत चांगले निर्णय झाले त्याबद्दल केजरीवालांनी पंजाब सरकारचं अभिनंदन केले.

नवी दिल्ली – पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन झालं आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट बैठक पार पडली आहे. त्यानंतर आता आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या आमदारांसोबत व्हर्चुअल बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री भगवंत मान, आप नेते राघव चड्ढा हेदेखील उपस्थित होते. या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी आमदारांना ‘कानमंत्र’ दिला आहे.

अरविंद केजरीवाल(AAP Arvind Kejariwal) म्हणाले की, मी आज तुमच्याशी बोलताना आनंदी आहे. त्यासोबत भावूक देखील झालोय. पंजाबच्या लोकांनी आपवर विश्वास ठेवला आणि आम आदमी पक्षाच्या कामावर मतदान केले. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह तुम्ही सगळ्यांनी पंजाबच्या जनतेसाठी चांगले काम करायला हवे. शेतकऱ्यांना नुकसानीचे पैसे द्यायला हवेत. भ्रष्टाचार मुक्त पंजाब बनवण्याचं आपलं आश्वासन पूर्ण करायला हवं. पंजाब सरकारनं पहिल्या कॅबिनेटमध्ये २५ हजार बेरोजगार युवकांना नोकरी देण्याचा निर्णय घेतला तो महत्त्वाचा आहे. लोकांना आपल्याकडून अपेक्षा आहेत. ३ दिवसांत चांगले निर्णय झाले त्याबद्दल केजरीवालांनी पंजाब सरकारचं अभिनंदन केले.

तसेच भाजपा अद्यापही ४ राज्यांत सरकार बनवू शकत नाही. पदांवरून त्यांच्या नेत्यांमध्ये वाद सुरू आहेत. पंजाबमध्ये मी ऐकलं ज्यांना मंत्रिपदं मिळाली नाहीत ते नाराज आहेत. आपकडे ९२ आमदार आहेत. त्यातील १७ मंत्री बनू शकतात. तुम्ही स्वत:ला मंत्र्यांपेक्षा कमी समजू नका. वेगळ्या इच्छा ठेवू नका. एका टीमप्रमाणे काम करा. सर्वांना जबाबदारी मिळेल. भगवंत मान तुमच्यावर देतील ती जबाबदारी पूर्ण करा. तुमच्यापैकी ९९ टक्के पहिल्यांदा आमदार बनले आहेत. तुम्ही कधी आमदार व्हाल असा विचार केला नसेल. काहींनी मोठमोठ्या नेत्यांना हरवलं आहे. परंतु अहंकार बाळगू नका. कुठल्याही पदावर आपला हक्क आहे असं समजू नका. जनता त्यांना नाकारते हे आधीच्या नेत्यांकडे बघून कळेल असा कानमंत्र अरविंद केजरीवाल यांनी आमदारांना दिला आहे.

भ्रष्टाचारावर सज्जड दम

अरविंद केजरीवालांनी या बैठकीत भ्रष्टाचाराचा मुद्द्यावरही भाष्य केले. काहीही सहन करू शकतो परंतु बेईमानी नाही. काम करण्याची संधी देऊ परंतु जर बेईमानी केली तर कारवाई करू. काहीही करा मात्र बेईमानी आणि जनतेचा अपमान करू नका. मी सोशल मीडियावर हे पाहिलंय. हे सगळं बोलण्याची गरज आहे का? काम करा, आपल्याला मान मिळेल. विरोधी असो वा अधिकारी हा त्यांचा दोष नाही. सिस्टम सुधारली पाहिजे. पंजाबच्या काही मंत्र्यांच्या घरातील लोकांनीही ‘आप’ला मतदान केले. पुढील ५ वर्षात ३ कोटी पंजाबी जनतेचे मन जिंकायचं आहे. पुढील वेळी एकही मत फिरता कामा नये. कुणी भ्रष्टाचार करत असेल तर सांगा असं आवाहनही अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या आमदारांना केले.  

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालPunjabपंजाब