शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

Manish Sisodia : "माझा आणि केजरीवालांचा काय दोष होता?"; सिसोदियांनी जेलमधून आल्यावर मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 08:34 IST

AAP Manish Sisodia And Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी सुलतानपूर माजरा येथे पदयात्रा केली. पदयात्रेत त्यांनी लोकांना विचारले की, "माझा काय दोष होता की या लोकांनी मला दीड वर्ष तुरुंगात ठेवलं."

आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी बुधवारी सुलतानपूर माजरा येथे पदयात्रा केली. या पदयात्रेत त्यांनी लोकांना विचारले की, "माझा काय दोष होता की या लोकांनी मला दीड वर्ष तुरुंगात ठेवलं. मी शाळाच तर बांधत होतो."

"मुख्यमंत्री अरविंद केजरीवालजी यांचा काय दोष होता, ते विजेचं बिल शून्य करत होते. जर केजरीवाल यांना भ्रष्टाचार करायचा असता, तर त्यांनी वीज बिल शून्य का केलं असतं? वीज महाग करून चोरी केली असती ना..." 

"दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर देवाचा आशीर्वाद आहे. तुम्हा सर्वांचं प्रेम असल्याने केजरीवालजी लवकरच बाहेर येतील. ते जेलमध्ये गेल्यानंतर ज्या काही अडचणी, समस्या येत असतील त्या भाजपाशी लढून दूर करतील" असं मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे.

"जनतेचं काम बंद पाडण्यासाठी केजरीवालांना जेलमध्ये टाकलं"

"आम्ही वीज बिल शून्यावर जाऊ देणार नाही, शाळा आम्ही बांधू देणार नाही. आम्ही हॉस्पिटल-मोहल्ला क्लिनिक बांधू देणार नाही असं भाजपावाले म्हणायचे. पण तुमचे पुत्र अरविंद केजरीवाल यांनी भाजपाशी लढून हे सर्व साध्य केलं. हे सर्व काम भाजपा करू शकत नाही, म्हणूनच त्यांनी दिल्लीतील जनतेचं काम बंद पाडण्यासाठी केजरीवाल यांना जेलमध्ये टाकलं"

"भाजपा हे सर्व करू शकत नाही"

"भाजपाने तुमचे आवडते अरविंद केजरीवालजी, संजय सिंहजी, सत्येंद्र जैनजी आणि मला जेलमध्ये टाकलं आहे कारण केजरीवाल यांनी शाळा आणि रुग्णालयं दुरुस्त केली आहेत, वीज बिल शून्य केलं आहे आणि महिलांसाठी बस प्रवास मोफत केला आहे. या सर्व गोष्टी कशा करायच्या हे भाजपाला कळत नाही, त्यांना फक्त काम थांबवून भांडण कसं करायचं हे माहीत आहे" असं देखील मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Manish Sisodiaमनीष सिसोदियाAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपा