शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

दिल्ली विधानसभेबाहेर 'आप' आमदारांचे 7 तास आंदोलन, विरोधी पक्षनेत्या आतिशी राष्ट्रपतींना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 21:27 IST

सभागृहात गदारोळ केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या 22 पैकी 21 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

नवी दिल्ली :  दिल्ली विधीमंडळाच्या अधिवेशनात उपराज्यपालांच्या भाषणावेळी गदारोळ केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या 22 पैकी 21 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, आज विरोधी पक्षनेत्या आतिशी आणि इतर सर्व आप आमदारांना दिल्ली विधानसभा संकुलात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. यानंतर त्यांनी विधानसभेच्या बाहेर सुमारे 7 तास आंदोलन केले. दिल्लीत सत्तेत आल्यानंतर भाजप हुकूमशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडत असल्याची टीका आतिशी यांनी केली.

बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो मुख्यमंत्री कार्यालयातून काढून टाकल्याच्या निषेधार्थ आंदोलन करत असल्याचे आप आमदारांचे म्हणणे आहे. याच अनुषंगाने गुरुवारी आप नेत्यांनी विधानसभा संकुलाच्या गेटबाहेर निदर्शने केली. यावेळी आपच्या नेत्यांनी बाबासाहेबांचा फोटो हातात घेऊन भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जय भीमचा नारा दिल्याने आप आमदारांना निलंबित करण्यात आल्याचा आरोप आपने केला. तसेच, सुमारे सात तासांच्या आंदोलनानंतर विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी उद्या राष्ट्रपतींना भेटणार असल्याचे सांगितले. 

विधानसभेच्या आवारात पोलिसांशी वादावादीआप आमदार आतिशी विधानसभेच्या आवारात प्रवेश करत असताना तेथे तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेरच रोखले. यानंतर त्यांची पोलिसांशी जोरदार वादावादी झाली. यादरम्यान, आतिशी यांनी पोलिसांना विधानसभेत प्रवेश का दिला जात नाही, असा प्रश्न केला, ज्यावर पोलिसांनी उत्तर दिले की, 'आप'च्या आमदारांना प्रवेश न देण्याचे आदेश सभापतींनी दिले आहेत. 

राष्ट्रपतींना पत्र लिहून भेटीची वेळ मागितलीआतिशी यांनी राष्ट्रपतींना एक पत्रही लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी दिल्लीतील सरकारी कार्यालयातून बाबासाहेब आणि भगतसिंग यांचे फोटो काढून टाकल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी पत्रात लिहिले की, मला एक अत्यंत गंभीर आणि संवेदनशील मुद्दा तुमच्या लक्षात आणून द्यायचा आहे, जो भारतीय लोकशाही मूल्यांवर थेट हल्ला आहे. दिल्लीतील भाजप सरकारने दिल्ली सरकारच्या विविध कार्यालयांवरून संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद-ए-आझम भगतसिंग यांची छायाचित्रे काढून टाकली आहेत. 

आम आदमी पक्षाने या विषयावर विरोध केला आणि हा गंभीर मुद्दा सभागृहात मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी आमच्या 21 आमदारांना निलंबित केले. आज आम्हाला विधानसभेच्या बाहेर रोखण्यात आले. लोकप्रतिनिधींना विधानसभेत येण्यापासून रोखणे म्हणजे भारताच्या लोकशाही इतिहासावर काळा डाग आहे, असेही त्यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :AAPआपdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपा