शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

चंद्रखुरी नको 'कौशल्य धाम' हवं! धीरेंद्र शास्त्रींची मागणी; लवकरच लग्न करणार असल्याचीही माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 17:02 IST

धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या विधानांमुळे प्रसिद्धीच्या झोतात असतात.

रायपूर: मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे मठाधिपती धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या विधानांमुळे प्रसिद्धीच्या झोतात असतात. छत्तीसगड दौऱ्यावर असलेल्या शास्त्री यांनी राजकीय पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. रायपूर येथे एक मोठे विधान केले असून छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांच्याकडे चंद्रखुरीचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. चंद्रखुरी या जागेचे नाव बदलून कौशल्य धाम ठेवावे, असे ते म्हणाले. मागील सरकारमुळे छत्तीसगडमध्ये धर्मांतर वाढले. ते दिशाहीन लोक होते, त्यामुळे येथे धर्मांतर वाढले, असे धीरेंद्र शास्त्रींनी सांगितले. तसेच मी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, जाती मोजण्यात काहीच अर्थ नाही, किती गरीब आहेत आणि किती त्रस्त आहेत याचा हिशोब व्हायला हवा. मंदिरे पाडू नका, चादरी अर्पण करणे हा चमत्कार आहे, मेणबत्ती लावणे हा चमत्कार आहे, मग मी जर दैवी दरबार लावला किंवा हनुमान चालीसा वाचली तर लोकांचे पोट का दुखते, असा प्रश्न त्यांनी केला. 

चंद्रखुरी नको 'कौशल्य धाम' हवंखरं तर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या याच कार्यक्रमात मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी धर्मांतराबाबत मोठे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, राज्यात प्रचंड प्रमाणात धर्मांतर होत आहे. विशेषतः जशपूरमध्ये लोक धर्मांतर करत आहेत. पण, भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप सिंग जुदेव यांच्या कुटुंबाने घरवापसी मोहीम सुरू केली. त्यांनी लोकांचे पाय धुवून त्यांना घरी परतायला भाग पाडले. दिलीप सिंग यांच्यानंतर त्यांचा मुलगा ही जबाबदारी पार पाडत आहे.

दुसरीकडे धीरेंद्र शास्त्री यांच्या घरवापसीच्या वक्तव्यावर काँग्रेसने टीकास्त्र सोडले. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी भाजपा विरोधी पक्षात असताना धर्मांतर होत असल्याच आरोप केला. राज्यात आता भाजपाचे सरकार आले आहे आणि केंद्रातही भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे भाजपाने पोकळ विधाने करून जनतेची दिशाभूल करू नये. धर्मांतराच्या विरोधात कायदा करायला हवा, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडbageshwar dhamबागेश्वर धामBJPभाजपाcongressकाँग्रेसChief Ministerमुख्यमंत्री