शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ABG Shipyard Scam: 'NDAच्या काळात बँकांची परिस्थिती सुधारली', एबीजी घोटाळ्यावरुन अर्थमंत्र्यांचा काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 16:11 IST

ABG Shipyard Scam: 'एबीजी शिपयार्ड खाते मोदी सरकारच्या काळात नाही, तर यूपीए सरकारच्या काळात एनपीएमध्ये बदलले.'

नवी दिल्ली: सध्या देशात एबीजी शिपयार्ड प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. यावरुन विरोधक केंद्रावर टीका करत आहेत. दरम्यान, यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाष्य केले. सोमवारी RBI बोर्ड सदस्यांना संबोधित केल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी देशातील सर्वात मोठ्या बँक फसवणूक प्रकरणावर बोलताना बँकांचे कौतुक केले आणि एनडीएच्या काळात बँकांमध्ये मोठी सुधारणा झाल्याचे त्या म्हणाल्या.

'यूपीएच्या काळात खाते बदलले'यावेळी बोलताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, या प्रकरणात बँकांचे कौतुक केले पाहिजे. कारण त्यांनी या प्रकारची फसवणूक शोधण्यासाठी सरासरीपेक्षा कमी वेळ घेतला. अशा प्रकरणांचा शोध घेण्यासाठी आणि पुढील कारवाई सुरू करण्यासाठी बँकांना 52 ते 56 महिने लागतात. पण, एनडीएच्या काळात बँकांची परिस्थिती सुधारली आहे. विशेष म्हणजे, एबीजी शिपयार्ड खाते मोदी सरकारच्या काळात नाही, तर आधीच्या यूपीए सरकारच्या काळात एनपीएमध्ये बदलले होते, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

सीबीआयची कारवाईविशेष म्हणजे केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने अलीकडेच ABG शिपयार्ड लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल आणि इतरांवर ICICI बँकेच्या नेतृत्वाखालील दोन डझन कर्जदारांच्या संघाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. हा संपूर्ण घोटाळा 22,842 कोटी रुपयांचा आहे.

आठ जणांवर गुन्हा याअंतर्गत कंपनीने 28 बँकांकडून कर्ज घेतले आहे. सीबीआयने या प्रकरणी 7 फेब्रुवारीला एफआयआर नोंदवला होता. यानंतर तपासाअंती छापे टाकून कंपनीचे माजी अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, एबीजी शिपयार्ड लिमिटेडने केलेली फसवणूक विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्या एकूण घोटाळ्याएवढी आहे.

काँग्रेसचा भाजपवर आरोपकाँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मीडिया प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी एबीजी शिपयार्ड कंपनीच्या 22 हजार कोटींहून अधिकच्या घोटाळ्याबाबत भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. जनतेचा पैसा लुटायचा, मग पळून जायचे, अशा रणनीतीवर सरकार काम करत असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला.

मोदींच्या मित्रांचे अच्छे दिनट्विटमधून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. मोदींच्या काळात 5,35,000 कोटी रुपयांची बँकांची फसवणूक झाली आहे. जनतेच्या पैशाची एवढी हेराफेरी 75 वर्षांत कधीच झाली नाही. लूट आणि फसवेगिरीचे हे दिवस फक्त मोदींच्या मित्रांसाठीच चांगले दिवस आहेत, अशी टीका राहुल यांनी केली.

 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनfraudधोकेबाजीbankबँक