शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

ऑलिम्पिकमधील भारताच्या अपयशाला व्यवस्थाच कारणीभूत - अभिनव बिंद्राचे टीकास्त्र

By admin | Published: August 17, 2016 8:24 AM

ऑलिम्पिकमधील भारताच्या अपयशसाठी येथील व्यवस्थाच जबाबदार आहे अशी टीका भारतीय नेमबाज अभिनव बिंद्राने केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे पदकांचे खाते अद्याप खुले झाले नसून त्याबाबत चहुबाजूंनी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. ' मात्र ऑलिम्पिकमधील भारताच्या अपयशसाठी येथील व्यवस्थाच जबाबदार आहे' अशी टीका भारतीय नेमबाज अभिनव बिंद्राने केली आहे. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून देणा-या अभिनवला यंदाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये मात्र पदक जिंकण्यात अपयश आले होते. रिओ ऑलिम्पिकमध्ये 10 मी. एअर रायफल इव्हेंटमध्ये अभिनव चौथ्या स्थानी राहिला होता, त्यामुळे त्याचं पदक थोडक्यात हुकलं होतं.
मंगळवारी ट्विटरवरून अभिनवने पदकांच्या अपेक्षेबाबत मत व्यक्त केले. आपल्या ट्विटमध्ये ब्रिटनचे उदाहरण देत बिंद्राने म्हटले आहे , ' एखाद्या देशाने त्यांच्या खेळाडूंमध्ये गुंतवणूक केल्यावरच त्यांच्याकडून पदकांची अपेक्षा केली जाऊ शकते. ब्रिटनने प्रत्येक पदकावर 55 लाख पाऊंड इतका खर्च केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची गरज आहे. जोवर देशातील व्यवस्था दुरुस्त होत नाही तोपर्यंत पदकाची अपेक्षा करता येणार नाही.’ असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.