शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
5
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
6
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
7
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
8
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
9
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
10
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
11
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
12
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
14
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
15
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
16
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
17
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
18
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
19
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
20
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story

अबब ! 12 वर्षात "या" महिलेचा तीनदा तलाक, चौथ्या तलाकची भीती

By admin | Published: May 03, 2017 3:20 PM

मुस्लिमांच्या तोंडी तलाक प्रथेनं वातावरण ढवळून निघालं असतानाच 35 वर्षीय तारा खान हिला चौथा तलाक मिळण्याची भीती सतावते आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 3 - मुस्लिमांच्या तोंडी तलाक प्रथेनं वातावरण ढवळून निघालं असतानाच 35 वर्षीय तारा खान हिला चौथा तलाक मिळण्याची भीती सतावते आहे. गेल्या 12 वर्षांत तारा हिचा तीन वेळा तलाक झाला आहे. आताचा तिचा चौथा निकाह झाला आहे. आपल्याला चौथा नवराही तलाक तर देणार नाही ना, या चिंतेनं या महिलेला ग्रासलं आहे. पीडित तारा म्हणाली, गेली 12 वर्षं माझ्यासाठी कोणत्याही वाईट स्वप्नांहून कमी नव्हेत. मात्र असं पुन्हा झाल्यास माझ्यासाठी कुठेच जागा उरणार नाही. तारा ही उच्चशिक्षित नाही. त्यांचा पहिला निकाह जाहीद खान या व्यक्तीशी झाला होता. निकाहाच्या 7 वर्षांनंतरही त्यांना मूल झालं नाही. त्यामुळे त्यांच्या पतीनं दुसरा निकाह केला आणि त्यांना तलाक दिला. नव-यानं तलाक दिल्यानंतर ती स्वतःच्या कुटुंबीयांच्या घरी राहू लागली. त्याच वेळी तिच्या नातेवाईकांनी पप्पू खान नावाच्या व्यक्तीसोबत ताराचा निकाह लावून दिला. मात्र त्यानंही तिला तलाक देऊन स्वतःच्या जीवनापासून दूर सारलं. तारा म्हणाली, पप्पू मला मारहाण करत होता. एक दिवस मी विरोध केला तेव्हा त्यानं अपशब्द उद्गारले आणि मला तलाक दिला. त्यामुळे माझा दुसरा निकाह तीन वर्षांतच संपुष्टात आला. दुस-या पतीनं तलाक दिल्यानंतर तारा स्वतःच्या मामांकडे वास्तव्यास गेली. त्यानंतर मामा आणि त्याच्या मुलानं ताराला समजावलं आणि ताराचं तिसरा निकाह लावून दिला. तिसरा नवरा सोनूशी निकाहाच्या चार महिन्यांनंतर ताराचा तलाक झाला. सोनूही ताराला खूप मारहाण करत होता. तो फारच हिंसक मनोवृत्तीचा होता. एकदा सोनूनं ताराला मामाच्या घरी नेलं आणि तीन तलाक देऊन टाकला. तीनदा तलाक झाल्यानंतर तारालाही पुन्हा निकाह करण्याची इच्छा नव्हती. मात्र त्यानंतर तिने कुटुंबीयांच्या खातर चौथा निकाह केला. ताराचा गेल्या जुलै महिन्यात शमशाद नावाच्या व्यक्तीसोबत निकाह झाला. तारा म्हणाली, माझ्यासोबत फार वाईट घटना घडल्या आहेत. मला शमशादही सोडणार नाही ना, यामुळे मी घाबरली आहे. माझ्या 5 भावांना वाटतं की मी कुटुंबीयांच्या बदनामीचं कारण आहे. आता ते मला स्वतःजवळ ठेवू इच्छित नाही. मला हा निकाह संपवायचा नाही. काहीही झालं तरी मला शमशादसोबतच राहायचं आहे. मात्र शमशादही माझ्या इतर नव-यांसारखाच आहे. गेल्या 12 वर्षांत मी खूप दुःख सोसलं आहे. आता दुःख सोसायची माझ्यात ताकद नाही. तारा आणि शमशादची सध्या बरेलीमध्ये काऊन्सिलिंग सुरू आहे. तारा म्हणते, गरज पडल्यास मी हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत घेऊन जाईन, माझ्या नव-यानं मला सोबत ठेवावं असं मला वाटतं.