शहरं
Join us  
Trending Stories
1
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
2
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
3
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
4
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
5
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
6
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
7
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
8
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
9
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
10
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
11
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
12
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
13
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
15
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
16
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
17
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
18
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
19
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
20
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी

Article 370 रद्द करूनही जम्मू काश्मीरच्या समस्येचं पूर्णपणे निराकरण झालं नाही, मोहन भागवत यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 8:33 AM

RSS Dr. Mohan Bhagwat on Article 370 Jammu kashmir : लोकसंख्येच्या विशिष्ट भागापर्यंत पोहोचून त्यांना भारताशी एकरूप करण्याची आवश्यकता असल्याचं भागवत यांचं वक्तव्य. 

ठळक मुद्देलोकसंख्येच्या विशिष्ट भागापर्यंत पोहोचून त्यांना भारताशी एकरूप करण्याची आवश्यकता असल्याचं भागवत यांचं वक्तव्य. 

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० केंद्र सरकारनं यापूर्वी रद्द केलं होतं. यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (RSS Dr. Mohan Bhagwat) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. "जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम ३७० रद्द केल्यानंतरही त्या ठिकाणच्या समस्येचं पूर्णपणे निराकरण झालेलं नाही. त्या ठिकाणच्या लोकसंख्येचा एक भाग आजही स्वातंत्र्याच्या गोष्टी करत आहे," असं भागवत म्हणाले. नागपुरात एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. समाजाला त्या लोकसंख्येच्या भागापर्यंत पोहोचला हवं जेणेकरुन त्यांना भारतासोबत एकरूप करता येईल, असंही ते म्हणाले. 

नुकताच आपण जम्मू काश्मीरचा दौरा केला आणि त्या ठिकाणी विकासाचा मार्ग मोकळा झाला असल्याचं भागवत म्हणाले. "गेल्या महिन्यात मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान जम्मू काश्मीरच्या मुस्लिम विद्यार्थ्याचं असं म्हणणं होतं की त्यांना भारताचा भाग बनून राहायचं हे आणि आता ते कोणत्याही समस्येशिवाय भारतीय बनून राहू शकतात," असंही त्यांनी नमूद केलं.यापूर्वी जम्मू आणि लडाखला भेदभावाचा सामना करावा लागत होता. काश्मीर खोऱ्यात खर्च होणाऱ्या साधनसंपत्तीच्या वापराचा ८० टक्के हिस्सा हा स्थानिक नेत्यांच्या खिशातजात होता आणि लोकांना त्याचा कोणताही लाभ मिळत नव्हता, असा आरोपही त्यांनी केला.

"आता यामध्ये बदल आला आहे आणि त्या ठिकाणची लोकं आनंदानं जीवन जगत आहेत. आपल्या मुलांच्या हाती पुस्तकांऐवजी दगड देणाऱ्या लोकांनी त्यांचं (दहशतवाद्यांचं) कौतुक बंद केलं. आता त्या ठिकाणी निराळं वातावरण आहे. येणाऱ्या काळात त्या ठिकाणी निवडणुका होतील आणि नव्या सरकारची स्थापनाही होईल," असंही भागवत यांनी नमूद केलं.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघJammu Kashmirजम्मू-काश्मीर