शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
2
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
3
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
4
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
5
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
6
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
7
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
8
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
9
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
10
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
11
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
12
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
13
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
14
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
15
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
16
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
17
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
18
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
19
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!
20
Pitru Paksha 2024: बेपत्ता होऊन अनेक वर्षं घरी न परतलेल्या व्यक्तीचेही श्राद्ध घातले जाते का? वाचा!

स्व. इंदिरा गांधींच्या मतदार संघात भारत जोडो यात्रेत दुर्घटना; चार कार्यकर्त्यांना बसला विजेचा शॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 11:48 AM

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरुवात झाली. 3750 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्यानंतर हा प्रवास जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये संपेल.

काँग्रेस नेते राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत. त्यांच्या यात्रेला मोठी गर्दी होत आहे. असे असताना बळ्ळारीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. या यात्रेतील ४ कार्यकर्त्यांना विजेचा शॉक लागला आहे. या सर्वांवर प्राथमिक उपचार करून हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. 

ही दुर्घटना आज, रविवारी सकाळी कर्नाटकच्या बळ्ळारीमध्ये घडली. या ठिकाणी आजच्या यात्रेची सुरुवात झाली होती, मौका नावाच्या गावात पोहोचली असता काही कार्यकर्त्यांना शॉक लागला. पक्षाचा झेंडा घेतलेले कार्यकर्ते निपचित पडल्याने सुरवातीला गोंधळ उडाला. मात्र, एक तास बाजुला दिसल्याने नेमके काय घडलेय ते इतरांच्या लक्षात आले. 

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, घटनास्थळी उपस्थित डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले आणि  रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात पाठवले आहे.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरुवात झाली. 3750 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्यानंतर हा प्रवास जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये संपेल. यात्रेत सहभागी असलेले सर्व सदस्य या कालावधीत 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जातील.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस