शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

राष्ट्रपतींची निवडणूक होणार १९७१ च्या जनगणनेनुसार

By admin | Published: May 30, 2017 1:33 AM

भारताच्या १४ व्या राष्ट्रपतीपदाची यंदाची निवडणूक ४६ वर्षे जुन्या म्हणजे १९७१ च्या लोकसंख्येच्या प्रमाणातच जुलैमध्ये होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताच्या १४ व्या राष्ट्रपतीपदाची यंदाची निवडणूक ४६ वर्षे जुन्या म्हणजे १९७१ च्या लोकसंख्येच्या प्रमाणातच जुलैमध्ये होणार आहे. देशातील अनेक राज्यांना त्यामुळे सध्याच्या लोकसंख्येनुसार मतदानाच्या मूल्यांकनात प्रतिनिधित्व मिळणार नाही, असे राज्यघटनेच्या जाणकारांचे मत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आमदार, खासदारांना मतदानाचा अधिकार असतो. आमदारांच्या मतांचे मूल्य राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरते. विधानसभेच्या एकूण जागांनी राज्याच्या लोकसंख्येला भागल्यानंतर जी संख्या येते, त्याचा भागाकार पुन्हा १ हजारांनी केल्यानंतर जी संख्या येते ते त्या आमदाराच्या मताचे मूल्यठरते.खासदारांचे मतमूल्य जरी समान असले, तरी प्रत्येक राज्यातील आमदारांच्या मतांचे मूल्य भिन्न आहे. २0११ च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १२१.0१ कोटी होती. ती २0१७ साली १२८ कोटींवर गेल्याचा अंदाज आहे. मात्र, राष्ट्रपती ४६ वर्षे जुन्या ५४.८१ कोटी लोकसंख्येच्या प्रमाणात तयार झालेल्या निर्वाचक मंडळाद्वारेच निवडले जातील.राज्यघटनेचे विशेषज्ञ सुभाष कश्यप यांच्या मते राष्ट्रपतीपदाच्या यंदाच्या निवडणुकीसाठी जनगणनेचे आधार वर्ष १९७१ ऐवजी २0११ केले, तर गेल्या ४0 वर्षांत वाढलेली देशाची लोकसंख्या लक्षात घेता आमदारांच्या मताचे मूल्य व एकूण मतदानात त्यांची हिस्सेदारी अनेक पटींनी वाढेल.मात्र, १९७१ च्या जनगणनेनुसार होणाऱ्या निवडणुकीत अनेक राज्यांना विद्यमान लोकसंख्येच्या प्रमाणात मतदानाच्या मूल्यांकनात प्रतिनिधित्व मिळणारनाही.२0२६ पर्यंतच्या सर्व निवडणुका १९७१ च्या जनगणनेनुसारच पहिल्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक १९५२ साली १९५१ च्या लोकसंख्येनुसार झाली. पुढे १९६१ साली जनगणनेची आकडेवारी वेळेवर न मिळाल्याने १९६२ सालची राष्ट्रपतीपदाची निवडणूकही १९५१ च्या लोकसंख्येच्या आधारेच झाली. त्यानंतर १९७१ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार ८0 च्या दशकापासून राष्ट्रपतीपदाची निवडणूक संपन्न होत आली आहे.वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार २00२ साली सत्तेवर असताना एक घटनादुरुस्ती झाली. या दुरुस्तीद्वारे निश्चित करण्यात आले की, २0२६ पर्यंतच्या राष्ट्रपतीपदाच्या सर्व निवडणुका १९७१ च्या जनगणनेनुसारच होतील. दक्षिणेकडील राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी विशेष कार्यक्रम राबवल्याने हा निर्णय घेण्यात आला.