शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'अच्छे दिन' वास्तवात कधीच नसतात; नितीन गडकरींचा युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 15:26 IST

 प्रत्येक माणूस हा असमाधानी असतो, त्यामुळे वास्तवात 'अच्छे दिन' कधीच नसतात.

नवी दिल्ली- सुख हे मानण्यावर असतं, या उक्तीच्या आधारे, 'अच्छे दिन' हे मानण्यावर असतात, असं 'लॉजिक' मांडत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मोदी सरकारचा बचाव केला आहे.  प्रत्येक माणूस हा असमाधानी असतो, त्यामुळे वास्तवात 'अच्छे दिन' कधीच नसतात, असा युक्तिवाद त्यांनी केला. 

इंडिया टुडे कॉन्क्लेव्हच्या आजच्या दुसऱ्या दिवशी 'रोड टू २०१९  : स्पीड बम्प अहेड?' या विषयावरील चर्चासत्रात नितीन गडकरी सहभागी झाले होते. देशात 'अच्छे दिन' आले, असं भाजपा २०१९च्या प्रचारात ठामपणे म्हणू शकेल का?, असा प्रश्न विचारल्यानंतर गडकरींनी थोडा सावध पवित्रा घेतला. 

'जो नगरसेवक असतो, त्याला आमदार व्हायचं असतं, आमदाराला खासदारकी खुणावत असते, खासदाराला मंत्री होण्याचं स्वप्न पडतं आणि मंत्र्यांना चांगल्या खात्याचं मंत्री व्हायचं असतं. ज्याच्याकडे मर्सिडीज असते तोही दुःखी असतो आणि बाइक असते तोही. अच्छे दिन हे मानण्यावर असतात. रोटी, कपडा और मकान म्हणजेच अच्छे दिन', असं जीवनाचं तत्वज्ञानच नितीन गडकरींनी सांगितलं. पंतप्रधान आवास योजनेतून घर बनत नाहीएत का?, सागरमाला प्रकल्पात १६ लाख कोटींची गुंतवणूक झालीय. हे अच्छे दिन नाहीत का?, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. काँग्रेसने जे ५० वर्षांत केलं नाही, ते आम्ही चार वर्षांत करून दाखवलं. सगळ्या अपेक्षा पाच वर्षांत पूर्ण होऊही शकत नाहीत, असंही त्यांनी नमूद केलं. 

२०१९ मध्ये पुन्हा सत्तेत येण्याचं काँग्रेसचं स्वप्न हे मुंगेरी लालच्या स्वप्नासारखंच आहे, असा टोला गडकरींनी लगावला. ईशान्य भारतातील निवडणुकीत त्यांची काय अवस्था झाली बघा, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीNitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपा