शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

न्याय व न्यायपालिकेच्या हितासाठीच उठवला आवाज- कुरियन जोसेफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 18:06 IST

सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांच्या कारभाराविरोधातली नाराजी उघड व्यक्त करणाऱ्या 4 न्यायाधीशांपैकी कुरियन जोसेफ यांनी हे प्रकरण लवकरच निवळेल अशी आशा व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांच्या कारभाराविरोधातली नाराजी उघड व्यक्त करणाऱ्या 4 न्यायाधीशांपैकी कुरियन जोसेफ यांनी हे प्रकरण लवकरच निवळेल अशी आशा व्यक्त केली आहे. कुरियन जोसेफ, जे चेलमेश्वर, मदन लोकूर आणि रंजन गोगोई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर आरोप केले. सरन्यायाधीश पसंतीच्या न्यायाधीशांकडे महत्त्वाचे खटले सुपूर्द करत असल्याचा आरोप केला होता. यावर शनिवारी कुरियन यांनी हे संपूर्ण प्रकरण न्याय आणि न्यायपालिकेच्या हितासाठी पुढे आणल्याचं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टात्या न्यायाधिशांनी अशा प्रकारे पत्रकार परिषद घेऊन अंतर्गत नाराजी व्यक्त करण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. 

'न्यायाधीशांनी हे पाऊन उचलल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या प्रशासनात अधिक पारदर्शकता येईल. आम्ही न्याय आणि न्यायपालिकेच्या हितासाठी आवाज उठवला आहे. यापेक्षा अधिक मला काही सांगायचं नाही,' असं कुरियन जोसेफ यांनी केरळमधील एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हंटलं. 

ज्या प्रकारे हे प्रकरण देशासमोर आले आहे, त्याचप्रकारे त्यावरील मार्गही निघेल. न्यायपालिकेवरील लोकांचा विश्वास वाढवण्यासाठीच हे पाऊल उचललं, असं कुरियन जोसेफ केरळमधील वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले आहेत.  

नेमकं प्रकरण काय ?

 देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली. न्यायमूर्ती जे चेलमेश्वर यांच्या घरी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टाचे प्रशासन गेल्या दोन महिन्यांपासून योग्यरित्या काम करत नसल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. जे चेलमेश्वर यांच्याबरोबर रंजन गोगोई, माधव बी लोकूर आणि कुरीयन जोसेफ या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली.  गेल्या दोन महिन्यांतील कारभारामुळे आम्ही वरिष्ठ न्यायमूर्ती दुःखी झालो आहोत. यापूर्वी न्यायव्यवस्थेत अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या नाहीत. याबाबत सरन्यायाधीशांसोबतही बोललो पण काही उपयोग झाला नाही असं ते म्हणाले.  आम्ही आमचा आत्मा विकला आहे असं उद्या कोणी म्हणू नये, न्यायव्यवस्था टिकली नाही तर लोकशाही टिकणार नाही असं ते म्हणाले. या प्रकरणी सरन्यायाधिशांना दोन महिन्यांपूर्वी एक पत्र पाठवलं होतं असं सांगत चेलमेश्वर यांनी ते पत्र सार्वजनिक केलं. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय