शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
4
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
5
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
6
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
7
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
8
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
9
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
10
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
11
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
12
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
13
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
14
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
15
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
16
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
17
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
18
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
19
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
20
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?

आंदोलकांनो, हिंसाचार सोडा!

By admin | Published: June 19, 2017 1:17 AM

स्वतंत्र दार्जिलिंग राज्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी हिंसाचाराच्या मार्गाने न जाण्याचे आवाहन केले

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली/दार्जिलिंग : स्वतंत्र दार्जिलिंग राज्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी हिंसाचाराच्या मार्गाने न जाण्याचे आवाहन केले. प्रश्न सोडवण्यासाठी संवाद साधा, असे ते येथे म्हणाले. हिंसाचार करून तुम्हाला उत्तर शोधता येणार नाही, असे सांगून गृहमंत्री म्हणाले की,‘‘ तेथे राहणाऱ्या लोकांनी शांत राहावे. सौहार्दाच्या वातावरणात या प्रश्नाशी संबंध असलेल्यांनी संवादाद्वारे आपापसांतील मतभेद व गैरसमज दूर करावेत.’’ भारतासारख्या लोकशाही देशात हिंसाचार करून कधीही प्रश्नाला उत्तर सापडणार नाही. आपापसांतील संवादातून कोणताही प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असे ते म्हणाले. सिंह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी रविवारी तेथील परिस्थितीवर चर्चा केली. दार्जिलिंगमध्ये रविवारी हजारो निदर्शक चौक बाझारमध्ये जमा झाले. त्यांनी गोरखा जनमुक्ती मोर्चाचा (जीजेएम) पोलिस गोळीबारात ठार झालेल्या कार्यकर्त्याचा मृतदेह आणला होता. तेथे त्यांनी स्वतंत्र गोरखा राज्याच्या मागणीच्या घोषणा दिल्या. जीजेएमचे कार्यकर्ते आणि सुरक्षा दलांमध्ये शनिवारी मोठ्या प्रमाणावर चकमकी उडाल्यानंतर दार्जिलिंग जिल्ह्यात मोठ्या संख्येने सुरक्षादले तैनात करण्यात आली आहेत. निदर्शकांनी दार्जिलिंगमधून पोलिस आणि सुरक्षा दले तत्काळ काढून घेण्याच्या घोषणा दिल्या. सिंगमारी येथे पोलिस गोळीबारात आमचे दोन कार्यकर्ते ठार झाल्याचा दावा जीजेएमने केला. पोलिसांनी आम्ही गोळीबार केलाच नाही, असे म्हटले. जीजेएमचे प्रमुख बिमल गुरुंग यांनी ममता बॅनर्जी या धादांत खोटे बोलत असल्याचे रविवारी म्हटले. गोरखालँडसाठीचे हे आंदोलन ईशान्येकडील काही बंडखोरांचे गट व विदेशी देशांनी केलेला मोठा कट असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी शनिवारी केला होता. स्वतंत्र राज्यासाठीचे हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असेही गुरुंग यांनी स्पष्ट केले. बॅनर्जी यांचा हा आरोप निराधार असून त्यातून त्या लोकांची दिशाभूल करीत आहेत. हे आंदोलन काही राजकीय संघर्ष नाही तर आमच्या अस्मितेचा लढा आहे. गोरखालँड मिळेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, असे ते दृकश्राव्य निवेदनात म्हणाले. स्वतंत्र गोरखालँडच्या मागणीला पाठिंबा म्हणून शेकडो मुस्लिमांनी रविवारी येथे शांतता मोर्चा काढला. त्यांनी पोलिस अत्याचारांचा निषेधही केला.