शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

देशातील पाच विमानतळांचे संचालन करण्याचे काम आता अदानी समूहाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 6:38 AM

अहमदाबाद, तिरुवनंतपूरम, लखनौ, मंगळुरू, जयपूरचा समावेश

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सहा विमानतळांच्या खासगीकरणासाठी जी निविदा प्रक्रिया राबविली त्यातील पाच विमानतळांच्या संचालनाची बोली अदानी समूहाने जिंकली आहे. त्यामुळे या पाच विमानतळांच्या संचालनाची जबाबदारी आता अदानी समूहाकडे येणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ही विमानतळे खासगी कंपनीकडे दिल्याने तिथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा मिळू शकतील.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अहमदाबाद, तिरुवनंतपूरम, लखनौ, मंगळुरू आणि जयपूर विमानतळांसाठी अदानी यांनी सर्वाधिक मोठी बोली लावली होती. याशिवाय आसाममधील गुवाहाटी विमानतळासाठी गुरुवारी बोली लावण्यात येणार आहे. मासिक प्रति प्रवासी शुल्क या आधारावर विमानतळ प्राधिकरणाने ही निवड केली आहे.प्राधिकरणाºया अधिकाऱ्यांनी सांगितले की, अदानी समूहाने लावलेली बोली ही अन्य स्पर्धकांच्या तुलनेत मोठी होती. ही पाच विमानतळे औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर अदानी समूहाकडे सोपविण्यात येणार आहेत. सहा विमानतळांसाठी १० कंपन्यांकडून ३२ तांत्रिक निविदा आमच्याकडे आल्या होत्या. ही सहा विमानतळे सध्या विमानतळ प्राधिकरणाच्या व्यवस्थापनाकडे आहेत.जागतिक दर्जाच्या सुविधा देणारसरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सहा विमानतळांच्या सार्वजनिक-खासगी भागीदारीसाठी (पीपीपी) एका प्रस्तावाला मंजुरी दिली होती. अहमदाबाद आणि जयपूर विमानतळासाठी सात निविदा विमानतळ प्राधिकरणाकडे आल्या होत्या. लखनौ आणि गुवाहाटीसाठी सहा निविदा, तर मंगळुरू आणि तिरुवनंतपूरमसाठी तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या. जागतिक स्तराच्या पायाभूत सुविधा पुरविणे हा यामागचा हेतू आहे.