शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

'आदर्श ग्राम योजनेचा' मोदींच्या हस्ते शुभारंभ, मात्र शिवसेना खासदार अनुपस्थित

By admin | Published: October 11, 2014 12:03 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाकांक्षी 'खासदार आदर्श ग्राम योजने'चा शनिवारी शुभारंभ केला, मात्र शिवसेनेचे खासदार या कार्यक्रमास अनुपस्थित होते.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाकांक्षी ' खासदार आदर्श ग्राम योजने'चा आज (शनिवार) शुभारंभ केला, मात्र या कार्यक्रमास शिवसेनेचा एकही खासदार उपस्थित नव्हता. शिवसेना-भाजपाची गेल्या २५ वर्षांपासून असलेली युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसत असून सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसनेचे खासदार आदर्श ग्राम योजनेच्या कार्यक्रमात उपस्थित राहतील का याबद्दल उत्सुकता होती, मात्र एकही खासदाराने या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. 
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जन्मदिनी राजधानी दिल्लीतील विज्ञान भवन येथे या योजनेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्गाटन झाले. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणादरम्यान पंतप्रधानांनी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत प्रत्येक खासदाराला गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करायचा आहे. ही योजना ३ टप्प्यांत राबवण्यात येईल. अल्प काळातील कामे तीन महिन्यांत पूर्ण करावी लागतील. तर मध्यम मुदत एक वर्ष व दीर्घ मुदत एका वर्षापेक्षा जास्त देण्यात आली आहे. त्या कालावधीत गावांची कामे पूर्ण करावी लागतील. खुद्द पंतप्रधानही त्यांच्या वारणासी मतदारसंघातील ककरिया गाव दत्तक घेऊन विकास करणार आहेत.
गावाचा विकास झाला तरच देशाचा विकास शक्य आहे असे सांगत पंतप्रधानांनी या योजनेची आवश्यकता स्पष्ट केली. मात्र खासदारांना आपले स्वत:चे वा सासुरवाडीचे गाव दत्तक घता येणार नाह, असा टोलाही पंतप्रधानांनी यावेळी लगावला.