शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

"ट्रेनचं माहिती नाही पण रेल्वेमत्र्यांकडे नक्कीच कवच आहे"; झारखंड रेल्वे अपघातावरुन आदित्य ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 11:39 AM

Jharkhand Train Accident : झारखंडमध्ये भीषण अपघात रेल्वेच्या सर्व बोगी रुळावरून घसरल्या असून या घटनेत दोघांचा मृत्यू झाला.

Aditya Thackeray on Train Accident : झारखंडमधील जमशेदपूरमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण रेल्वे अपघात झाला. झारखंडमधील चक्रधरपूर रेल्वे विभागातील बारांबो रेल्वे स्थानकाजवळ हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेसचे सर्व डबे रुळावरून घसरले. या अपघातात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झालेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रेल्वे अपघाताच्या घटना समोर येत आहेत. विरोधकांकडून झारखंडमधील घटनेवरूनही रेल्वे मंत्र्यांवर निशाणा साधला जात आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका केली आहे.

पहाटे पावणेचारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. ट्रेन क्रमांक १२८१० हावडा सीएसएमटी एक्सप्रेस ही चक्रधरपूर डिव्हीजनमधील राजखरसावां जंक्शनजवळ रुळावरून घसरली. हा अपघात इतका भीषण होता की दोन प्रवाशांचे मृतदेह ट्रेनच्या बाथरूममध्ये अडकले. रेल्वेचा डबा कापून मृतदेह बाथरूममधून बाहेर काढण्यात आला. या अपघातानंतर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आमदार आदित्य ठाकरे यांनी या घटनेवरुन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर निशाणा साधला.

"मला गाड्यांबद्दल माहिती नाही, पण रेल्वेमंत्र्यांकडे नक्कीच काही तरी कवच आहे, ज्यामुळे त्यांच्या कार्यकाळात इतके रेल्वे अपघात होऊनही त्यांना पदावरुन हटवले गेले नाही. दर आठवड्याला काही ना काही अपघात घडतात, मात्र कारवाई होत नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी निवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजपचे 'राजकीय प्रभारी' मंत्री करण्यात आले आहेत. त्यांनी मंत्रालयावर लक्ष केंद्रित करायला नको का?," असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेसच्या काही बोगी रुळावरून घसरल्या आणि जवळच उभ्या असलेल्या शेजारी उभ्या असलेल्या मालगाडीला धडकल्या. हा अपघात झाला तेव्हा ट्रेन ताशी १२० किलोमीटर वेगाने जात होती. या अपघातात ३० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमींना चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयात आणण्यात आलं आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवIndian Railwayभारतीय रेल्वे