शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
2
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
3
१४७ वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं! पाकिस्तानचे लाजिरवाणे विक्रम; ३ वर्षांपासून विजयाचा दुष्काळ
4
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
5
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
6
अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी
7
इस्रायलचा लेबनानमध्ये भारतीय सैन्य असलेल्या ठिकाणी हल्ला; इंडोनेशियाचे तीन जवान जखमी, संयुक्त राष्ट्रे संतापली
8
AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती
9
करिअर की लग्न यात गोंधळलात? ऐश्वर्या नारकर यांनी तरुणाईला दिला मोलाचा सल्ला, उलगडला त्यांचा प्रवास
10
Airtel, Jio की Vi, कोणत्या कंपनीकडे आहे सर्वात स्वस्त Netflix प्लॅन?
11
Ajit Pawar : 'महायुतीत अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न'; काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
12
Jio Financial Services नं लाँच केलं जिओ फायनान्स अ‍ॅप; युझर्सना मिळणार अनेक ऑफर्स, जाणून घ्या
13
देवेंद्र फडणवीसांपेक्षा शाह-शिंदेंची जवळीक का वाढली?; संजय राऊतांचा मोठा दावा
14
कॉलेजमध्ये शिक्षणासोबत मिळणार नोकरी आणि पैसे; UGC नं तयार केला जबरदस्त प्लॅन
15
"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो..."; शिवसेना दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरे चर्चेत
16
'गूडन्यूज' चा योग! पुन्हा Ajinkya Rahane साठी फायद्याचा ठरणार? Rohit Sharma आउट झाला तर...
17
पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; ऑडीच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू,घरातून केली अटक
18
देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात
19
Rafael Nadal च्या या खास अंदाजामुळे MS धोनीही झाला त्याचा 'जबरा फॅन' (VIDEO)
20
५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा सुत्रधार दुबईतून ताब्यात; सौरभ चंद्राकरला आणणार भारतात

Aditya Thackeray: महाराष्ट्राची दारं तुमच्यासाठी खुली, शिवसेनेनं पीडित कश्मिरी पंडितांना दिला धीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 12:21 PM

काश्मिर खोऱ्यातून शेकडो भयभीत कश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे.

श्रीनगर - कश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करील, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. गेल्या काही दिवसांपासून कश्मिरी पंडित आणि हिंदूंचे ‘टार्गेट किलिंग’ कश्मीर खोऱ्यात सुरू आहे. महिनाभरात अनेक कश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली. त्यावर, भाजपाचे राष्ट्रीय नेते गप्प का आहेत, असा सवालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबादच्या सभेत केला होता. त्यानंतर, आता शिवसेना नेत्यांनी काश्मीरमध्ये जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली आहे.  

काश्मिर खोऱ्यातून शेकडो भयभीत कश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे. अवघ्या देशात याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोऱ्यातील या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच, औरंगाबादच्या आपल्या सभेतही त्यांनी काश्मिरी पंडितांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध भाजप नेते गप्प का, असा सवाल केला होता. तसेच, शिवसेना काश्मिरी पंडितांच्या पाठिशी आहे, महाराष्ट्र त्यांच्यासाठी शक्य ती मदत करेन, असे आश्वासनही त्यांनी दिले होते. त्याच, पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी काश्मीर खोऱ्यात जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. 

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या रजनी बाला यांच्या पती आणि मुलीची भेट घेण्यासाठी प्रियंका चतुर्वेदी गेल्या होत्या. त्यावेळी, रजनी यांच्या मुलीला पाहून गहिवरुन आल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, राज्यपाल महोदयांनी पीडित कुटुंबाची भेट घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. शिवसेना नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, प्रियंका चतुर्वैदी यांनी पीडित कुटुंबीयांची आणि काश्मिरी पंडितांची भेट घेऊन महाराष्ट्र त्यांच्या पाठिशी असल्याचा धीर त्यांना दिल्याचे म्हटले आहे. त्यांच्यासाठी महाराष्ट्राचे दरवाजे कधीही खुले आहेत, असेही ते म्हणाले.   

काश्मिरी पंडितांच्या पाठिशी महाराष्ट्र- मुख्यमंत्री

काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांचे अक्षरश: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्ने दाखविली गेली, पण घरवापसी तर दूरच उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारले जात आहे. या भयानक परिस्थितीत पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले, ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे. याक्षणी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी इतकंच वचन देऊ शकतो की, या कठीण काळात काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAditya Thackreyआदित्य ठाकरेJammu Kashmirजम्मू-काश्मीर