शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

विद्यापीठात आता वर्षातून दोन वेळा प्रवेश, परदेशी विद्यापीठाच्या धर्तीवर निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 07:18 IST

Education 2024: परदेशातील विद्यापीठांच्या धर्तीवर भारतातील विद्यापीठे आणि उच्चशिक्षण संस्थांमध्ये आता वर्षातून दोनदा प्रवेश मिळणार आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परवानगी दिली आहे. २०२४-२५ च्या शैक्षणिक सत्रापासून याबाबतची अंमलबजावणी केली जाणार आहे

 नवी दिल्ली - परदेशातील विद्यापीठांच्या धर्तीवर भारतातील विद्यापीठे आणि उच्चशिक्षण संस्थांमध्ये आता वर्षातून दोनदा प्रवेश मिळणार आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परवानगी दिली आहे. २०२४-२५ च्या शैक्षणिक सत्रापासून याबाबतची अंमलबजावणी केली जाणार असून, जुलै-ऑगस्ट  आणि जानेवारी-फेब्रुवारी अशा दोन वेळा प्रवेश प्रक्रिया  राबविल्या जातील, अशी माहिती यूजीसीचे प्रमुख जगदेश कुमार यांनी दिली.

भारतीय विद्यापीठांत वर्षातून दोनदा प्रवेश मिळाल्यास त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होईल. बोर्डाच्या परीक्षांच्या निकालांस झालेला उशीर, आरोग्य समस्या किंवा वैयक्तिक कारणांमुळे ज्या विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्टच्या सत्रात विद्यापीठात प्रवेश घेता आला नाही, त्यांना जानेवारी-फेब्रुवारीच्या सत्रात प्रवेश घेता येईल. द्विवार्षिक प्रवेशामुळे महाविद्यालयांना मनुष्यबळ, साधनसामग्रीचे नियोजन करता येईल. विविध विद्याशाखा, प्रयोगशाळा, वर्गखोल्या आणि सहायक सेवा अधिक कार्यक्षमतेने देता येईल. परिणामी, विद्यापीठात चांगले शैक्षणिक वातावरण तयार होईल, असे कुमार म्हणाले.

आंतरराष्ट्रीय सहकार्यास मदत जगभरातील विद्यापीठे आधीपासूनच द्विवार्षिक प्रवेश प्रणालीचे पालन करतात. भारतातील संस्थांनी द्विवार्षिक प्रवेश पद्धती स्वीकारल्यास त्या आंतरराष्ट्रीय सहयोग आणि विद्यार्थी देवाणघेवाण वाढवू शकतात. त्यातून जागतिक स्पर्धात्मकता वाढेल व जागतिक शैक्षणिक मानकांशी जुळवून घेता येईल, असेही कुमार म्हणाले. 

द्विवार्षिक प्रवेश बंधनकारक नाहीविद्यापीठे व उच्चशिक्षण संस्थांना द्विवार्षिक प्रवेश देणे बंधनकारक असणार नाही. ज्यांच्याकडे आवश्यक पायाभूत सुविधा आणि अध्यापन वर्ग आहे, ते या संधीचा उपयोग करू शकतात. ज्यांना उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये नवीन अभ्यासक्रम उपलब्ध करायचे आहे, त्यांना ही चांगली संधी आहे, असे कुमार म्हणाले.

वर्षभर वाट पाहावी लागणार नाही द्विवार्षिक विद्यापीठ प्रवेशामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्यास मदत होईल. कारण एकदा प्रवेश चुकल्यास त्यांना प्रवेशासाठी आखणी एक वर्ष प्रतीक्षा करावी लागणार नाही, तसेच उद्योगांना त्यांची कॅम्पस भरती वर्षातून दोनदा करता येईल, त्यामुळे पदवीधरांना रोजगाराच्या अधिक संधी मिळतील, असेही कुमार यांनी सांगितले.

टॅग्स :universityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालय