शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
3
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
4
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
5
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
6
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
7
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
8
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
9
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
10
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
11
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
12
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
13
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
14
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
15
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
16
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
17
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
18
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
19
"पहिल्या सीझनला मला स्पर्धक म्हणून ऑफर होती", केदार शिंदेंचा खुलासा; म्हणाले, 'शो स्क्रीप्टेड...'
20
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर

ऐन दुष्काळात मटक्याचा झटका

By admin | Published: April 08, 2016 12:02 AM

शिवराज बिचेवार, नांदेड दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारपेठ मंदीच्या सावटाखाली असताना, अवैध इमानदारीचा व्यवसाय असलेल्या मटक्याचा झटका मात्र तेजीत आहे़

शिवराज बिचेवार,  नांदेड दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारपेठ मंदीच्या सावटाखाली असताना, अवैध इमानदारीचा व्यवसाय असलेल्या मटक्याचा झटका मात्र तेजीत आहे़ ऋतु कोणताही असो, परिस्थिती काहीही असो परंतु कल्याण-मिलनच्या या खेळावर नियंत्रण ठेवण्यात पोलिस यंत्रणेला अपयश येत असून त्यामुळे अनेक कुटुंबे उद्धवस्त होत आहेत़ जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून मटक्याचा हा व्यवसाय सुरु आहे़ या अवैध धंद्याबाबत थोडा गाजावाजा झाला की, लगेच पोलिस प्रशासनाकडून किरकोळ बुकीवर कारवाई करुन आपली पाठ थोपटण्यात येते़ परंतु या व्यवसायाचे बडे मासे मोकळेच राहतात़ त्यात अशा कारवाईनंतर प्रत्यक्षात पुन्हा फायदा पोलिसांचाच होत असल्याचेही बुकीचे म्हणणे आहे़ नांदेड शहरात लोकमत चमुने पाहणी केली असता, सर्वच ठिकाणी मटक्याचे अड्डे राजरोसपणे सुरु असल्याचे पहावयास मिळाले़ शहरातील शिवाजीनगर भागात एका टपरीवर काही मिनिटांच्या अवधीने चोरट्या पावलाने एक-एक जण येत होता़ अन् आपले आकडे सांगून निघून जात होता़ असाच प्रकार गोकुळनगर, अण्णाभाऊ साठे चौक, गणेशनगर वाय पॉर्इंट, जयभीनगर, नवी आबादी, तेहरानगर आदी परिसरात पहायला मिळाला़ प्रत्येक ठिकाणी पानटपरी, छोटे किराणा दुकान, टेलरिंगचे दुकान, केश कर्तनालय, चहाची टपरी या ठिकाणी सर्रासपणे मटका स्विकारला व लावला जात असल्याचे पहावयास मिळाले़ शहरात आजघडीला अशाप्रकारचे २०० हून अधिक मटक्याचे अड्डे असल्याचे आढळले़ झोपडपट्टी भागात मटक्याचे व्यसन अनेकांना असल्याचे दिसत आहे़ १५० ते २०० रुपये रोजंदारीवर काम करणारे बहुतेक मजूर झटपट श्रीमंत होण्याच्या नादात दिवसातून एक तरी, आकडा लावून नशीब आजमावित असल्याचे दिसून येते़ परंतु दिवसेंदिवस झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकांची कुटुंबे उद्धवस्त झाली असल्याचे पाहणीत आढळून आले आहे़ विशेष म्हणजे पोलिसांनाही मटका बुकींची इत्यंभूत माहिती असते़ अवैध व्यवसायातही आधुनिकताआजघडीला सर्वत्र मोबाईल, इंटरनेटचा वापर करण्यात येत आहे़ मटक्याच्या अवैध व्यवसायातही मोबाईल आणि इंटरनेटमुळे मटका बुकी आणि ग्राहकांची मोठी सोय झाली आहे़ यापूर्वी आपण लावलेला आकडा आला की नाही? किंवा तो लावण्यासाठी मटका बुकींकडे जावे लागत होते़ परंतु आता मोबाईलवरुन मटका स्विकारणे आणि लावणे सुरु आहे़ त्याचबरोबर इंटरनेटवर बसून कुठेही नेमका कोणता आकडा आला अन् किती रुपयांचा आला याचीही माहिती मिळत आहे़ कल्याण-मिलनजिल्ह्यात दुष्काळामुळे एक-एक व्यवसाय बंद पडत आहेत़ बाजारात आर्थिक उलाढाल नसल्यामुळे व्यापारी हैराण झाले आहेत़ शेतकऱ्यांनी तर कर्जाला कंटाळून आत्महत्येसारखा मार्ग स्विकारला आहे़ अशा परिस्थितीत अवैध इमानदारीचा हा धंदा मात्र तेजीत आहे़ गल्ली बोळासह उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिसरातही आता धंद्याने पाय पसरले आहेत़ पोलिस प्रशासन जोपर्यंत गंभीरपणे अशा जुगाऱ्यांवर कारवाई करणार नाही तोपर्यंत या व्यवसायाचे समुळ उच्चाटन होणे शक्य नाही़