शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पुरग्रस्त केरळला मदत नाही; केंद्राने डाव्यांची सत्ता असलेल्या राज्याला वगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 15:07 IST

केरळमध्ये डाव्यांची सत्ता असून भाजप आणि डाव्या पक्षात शबरीमला प्रकणावरून मतभेद आहेत. काही दिवसांपूर्वीच केरळ विधानसभेत सीएए कायदा लागू न करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. केरळ सरकारच्या या कृतीला केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी असंविधानिक म्हटले होते. 

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी सरकारने पुरग्रस्त राज्यांना 6 हजार कोटींची मदत करण्याचे निश्चित केले आहे. गेल्या वर्षी देशातील सात राज्यांना पुराचा फटका बसला होता. तर केरळ राज्याला 2018 आणि 2019 या दोन्ही वर्षांत पुराचा फटका बसला होता. मात्र मदत जाहीर झालेल्या राज्यांमध्ये केरळचा समावेश करण्यात आला नाही. अर्थात डाव्यांची सत्ता असल्यामुळे मोदी सरकारने मदत देण्याचे टाळल्याचे आरोप करण्यात येत आहे. 

केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी पुरग्रस्त राज्यांसाठी 5908.56 कोटींचा मदतनिधी देऊ केला आहे. सात राज्यांसाठी हा निधी देण्यात आला असून यामध्ये आसाम, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, त्रिपुरा आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे. यापैकी आसाम, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, त्रिपुरा आणि उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता असून मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस तर महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनेची सत्ता आहे. 

पुरग्रस्त सात राज्यांना मदतनिधी देण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वातील समितीने घेतला आहे. मात्र यातून केरळला का वगळले हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. वास्तविक पाहता केरळला 2018 आणि 2019 मध्ये पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी केंद्राकडून मदत नाकारल्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे. केरळला मदतनिधीतून वगळणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

केरळमध्ये डाव्यांची सत्ता असून भाजप आणि डाव्या पक्षात शबरीमला प्रकणावरून मतभेद आहेत. काही दिवसांपूर्वीच केरळ विधानसभेत सीएए कायदा लागू न करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. केरळ सरकारच्या या कृतीला केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी असंविधानिक म्हटले होते.