शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Afghanistan Crisis: ...म्हणून भारताऐवजी या देशांत जाण्यास प्राधान्य देताहेत अफगाणिस्तानमधील हिंदू आणि शीख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 15:58 IST

Afghanistan Crisis Update:

नवी दिल्ली - अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर भारतासह अनेक देशांनी तेथून आपल्या नागरिकांना काढण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत शेकडो लोकांना भरात सरकारने अफगाणिस्तानमधूनभारतात सुरक्षित आणले आहे. (Afghanistan Crisis )मात्र अजूनही अफगाणिस्तानमध्ये काही नागरिक आहेत, जे भारतात परत येऊ इच्छित नाहीत. या लोकांची संख्या ७० ते ८० च्या दरम्यान आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेले हे हिंदू आणि शीख अमेरिका किंवा कॅनडामध्ये जाण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे ते भारताकडून पाठवण्यात आलेली विमाने सोडत आहेत. या परिस्थितीमुळे भारत सरकारसमोरील आव्हान वाढले आहे. एका रिपोर्टनुसार गेल्या काही दिवसांमध्ये भारतातून अफगाणिस्तानमध्ये पाठवली गेलेली विमाने रिकामी परत आली आहेत. (so Hindus and Sikhs in Afghanistan prefer to go to these countries instead of India)

इंडियन वर्ल्ड फोरमचे अध्यक्ष पुनीत सिंह चंधोक यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमधील गुरुद्वारा कर्ते परवानमध्ये उपस्थित असलेले ७० ते ८० अफगाण शीख आणि हिंदू भारतात परत येऊ इच्छित नाही. त्यांचा कॅनडा किंवा अमेरिकेत जाण्याची इच्छा आहे. हे लोक केवळ फ्लाईट सोडत नाही आहेत. तर इतर लोकांच्या येण्याच्या मार्गातही अडथळे आणत आहेत.

पुनीत सिंग यांनी सांगितले की, या लोकांना अमेरिका आणि कॅनडामध्ये जाण्याच्या नादात दोन वेळा विमान सोडले आहे. भारत सरकार उच्चस्तरीय सुविधा उपलब्ध करून देत असतानाही हे लोक भारतात येण्यास नकार देत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शीख संघटनांनी सर्व अफगाण शीख आणि हिंदूंना बाहेर पडण्यासाठी चार्टर्ड प्लेनची व्यवस्था केली आहे. यामधून १०० जण काबुल विमानतळाबाहेर आले होते. मात्र त्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही.

दरम्यान, गुरुद्वारामध्ये असलेल्या शीखांचे नेते तरविंदर सिंग यांनी एक व्हिडीओ संदेश पाठवला आहे. त्यात ते म्हणतात की, त्यांना भारतात यायचे नाही. तर अमेरिका किंवा कॅनडामध्ये जायचे आहे. अमेरिका किंवा कॅनडामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करण्यात चुकीचे काय आहे, असा प्रश्नही काही जणांनी उपस्थित केला आहे. जे लोक भारतात गेले आहेत. त्यांची काय अवस्था झालीय हे आम्हाला माहिती आहे. ते परत अफगाणिस्तामध्ये आले किंवा परत इतर देशांमध्ये गेले.

तालिबानने गेल्या रविवारी काबुलवर कब्जा केलाहोता. त्यानंतर भारत सरकारने अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलमधून राजदूत आणि दुतावासामधील अन्य कर्मचाऱ्यांसह सुमारे २०० जणांना हवाई दलाच्या सी-१९ विमानातून भारतात परत आणले होते. त्यानंतर अफगाणिस्तानमधून सामान्य नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम सातत्याने सुरू आहे.  

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानIndiaभारतHinduहिंदू