शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

पाक अखेर ताळ्यावर!

By admin | Published: January 08, 2016 3:57 AM

पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेक्यांचा सहभाग असल्याची गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेली माहिती आम्ही पुरविली आहे, आता तडकाफडकी निर्णायक कारवाई करा, त्यावरच चर्चा निर्भर राहील

इस्लामाबाद/नवी दिल्ली : पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेक्यांचा सहभाग असल्याची गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेली माहिती आम्ही पुरविली आहे, आता तडकाफडकी निर्णायक कारवाई करा, त्यावरच चर्चा निर्भर राहील, असे भारताने ठणकावल्यानंतर अखेर पाकिस्तान ताळ्यावर आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन भारताने दिलेल्या माहितीवर वेगाने काम करण्याचे फर्मान पाकिस्तानी अधिकाऱ्यांना सोडले. शरीफ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दूरध्वनीवर बोलणे झाल्यानंतर भारताने पाकला तातडीने व निर्णायक कारवाईची आम्ही वाट बघत आहोत, असे म्हटले होते. शिवाय अमेरिकेनेही पाकने दिलेला शब्द पाळावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत दबाव टाकला होता.शरीफ यांनी बोलाविलेल्या या बैठकीत राष्ट्रीय आणि विभागीय सुरक्षेवर चर्चा झाली, असे पंतप्रधानांच्या कार्यालयाने गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. बैठकीनंतर, भारताने पठाणकोट हल्ल्यासंदर्भात जी माहिती पाकला दिली त्यावर चर्चा होऊन त्याआधारे वेगाने काम करण्यास सांगण्यात आले. पठाणकोट हल्ल्यामध्ये सहभाग आढळणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे, असेही त्याने सांगितले. मात्र आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारताने दिलेली माहिती केवळ दूरध्वनी क्रमांक असून ती पुरेशी नाही व पाकने भारताकडे आणखी माहिती मागवली आहे. पाकिस्तानने ठोस कारवाई करावी असे भारताने म्हटले असले तरी त्यासाठी कालमर्यादा ठरवून दिली नाही. पठाणकोट येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे सीमापार दहशतवादी कारवायांकडे नव्याने लक्ष वेधले गेले आहे. चेंडू पाकिस्तानच्या अंगणात आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करताना ठोस कारवाई करण्याचे सुचविले आहे. शरीफ यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिले आहे. आम्हाला त्यांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे, असे स्वरूप यांनी नमूद केले.लाहोर भेटीमुळे सकारात्मक वातावरणपंतप्रधान मोदी यांनी गेल्या महिन्यात लाहोरला भेट दिल्यानंतर दोन देशांच्या संबंधांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. पठाणकोट येथील हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर ठोस कारवाई केली जावी, यासाठी भारत प्रयत्नशील राहील, असेही ते म्हणाले.- आणखी वृत्त/१०पठाणकोट हवाई तळावर झालेल्या हल्ल्याचे मूळ पाकिस्तानात असल्याचे स्पष्ट होताच इस्लामाबाद येथे १५ जानेवारी रोजी विदेश सचिव एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे समकक्ष अझीझ अहमद चौधरी यांच्यासोबत होणारी चर्चा अनिश्चिततेच्या फेऱ्यात अडकल्याचे संकेत मिळाले आहेत. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी पत्रकार परिषदेत भारताची भूमिका स्पष्ट केली; मात्र पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार करूनही त्यांनी चर्चा होणार की नाही याबाबत भाष्य टाळले. सचिव स्तरावरील चर्चेपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावर चर्चा करणार काय, या मुद्द्यावर ते म्हणाले की, याबाबत पाकिस्तानशी अद्याप चर्चा झालेली नाही. पाकिस्तानसोबतच्या विदेश धोरणात सातत्याचा अभाव असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. -आणखी वृत्त/१२