शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

रेल्वेमंत्र्यांची मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी खूशखबर; अर्थसंकल्पानंतर केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 09:55 IST

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

Ashwini Vaishnaw Budget 2024: लोकसभेत मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडला. रोजगार आणि ग्रामीण विकासावर अधिक खर्च करण्याबरोबरच काही राज्यांना अधिक पैसा देऊन समतोल राखण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी कोणतीही नवी घोषणा केलेली नसली तरी यासाठी २ लाख ६२ हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय. त्यासोबत रेल्वे प्रवाशांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी १५ हजार ५११ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अर्थसंकल्पानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोट्यवधी रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर दिली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पावर ८३ मिनिटे भाषण केले. पण या सगळ्यात रेल्वेचे नाव फक्त एकदाच ऐकायला मिळाले. त्यामुळे रेल्वेसाठी कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्याचे म्हटलं जात आहे. मात्र आता मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आनंदाची बातमी दिली. "रेल्वे सध्या अडीच हजार नॉन-एसी डबे बनवत आहे आणि येत्या तीन वर्षांत आणखी दहा हजार अतिरिक्त नॉन-एसी डबे बनवले जातील. कमी उत्पन्न असलेली कुटुंबे आणि मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या किमतीत सुरक्षितपणे प्रवास करता यावा हा रेल्वेचा उद्देश आहे. या गाड्या हजार किलोमीटरच्या प्रवासासाठी ४५० रुपये खर्चून जागतिक दर्जाच्या सुविधा देणार आहेत," अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.

"२०१४ पूर्वी रेल्वेसाठी भांडवली खर्चावरील गुंतवणूक सुमारे ३५,००० कोटी रुपये होती. आज ती २.६२ लाख कोटी रुपये आहे. रेल्वेसाठी हा विक्रमी भांडवली खर्च आहे. रेल्वेत अशा गुंतवणुकीसाठी मी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचा खूप आभारी आहे. २०१४ पूर्वीची ६० वर्षे पाहिल्यास, ट्रॅकची क्षमता आहे की नाही याची खात्री न करता नवीन गाड्यांची घोषणा करण्यात आली होती. रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या अवस्थेशी कोणताही संबंध नसलेल्या पूर्णपणे लोकप्रिय उपाययोजना केल्या गेल्या. मात्र गेल्या १० वर्षांमध्ये पाया योग्यरित्या घातला गेला आहे याची खात्री करण्यावर मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केले आहे," असे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.

"आतापर्यंत ४०,००० किलोमीटर रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. तर ३१,००० किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्ग तयार करण्यात आला आहे. २०१४ पूर्वीचे विद्युतीकरण पाहिले तर ६० वर्षांत २०,००० किलोमीटरचे विद्युतीकरण झाले होती. केवळ १० वर्षात ४०,००० किलोमीटरचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. ट्रॅक बांधणीचा वेग बघितला तर २०१४ मध्ये तो फक्त चार किमी प्रतिदिन होता तर गेल्या आर्थिक वर्षात तो १४.५ किमी प्रतिदिन होता. प्रवाशांच्या सुरक्षेकडेही खूप लक्ष देण्यात आले आहे. मागील वर्षी सुरक्षेशी संबंधित उपक्रमांमध्ये ९८,००० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती, या वर्षी सुरक्षेशी संबंधित उपाय योजनांसाठी १,०८,००० कोटी रुपयांची तरतूद आहे," असेही अश्विनी वैष्णव म्हणाले.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2024Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवIndian Railwayभारतीय रेल्वे