शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 12:06 PM

डॉ. अंजू शर्मा या १९९१ च्या बॅचच्या गुजरात केडरच्या आयएएस अधिकारी आहेत.

अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. डॉ. अंजू शर्मा या १९९१ च्या बॅचच्या गुजरात केडरच्या आयएएस अधिकारी आहेत. आपली मेहनत, समर्पण आणि ध्येयाप्रती असलेलं वेड या गोष्टींमुळे त्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. मूळच्या राजस्थानमधील भरतपूर येथे राहणाऱ्या डॉ. अंजू स्वतःच्या चुकांमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत नापास झाल्या. पण नंतर त्या चुकांमधून शिकल्या.

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC परीक्षा उत्तीर्ण करून त्या IAS झाल्या. अपयशातून शिकून आवश्यक बदलांसह योग्य मार्गाचा अवलंब करून ध्येयाकडे वाटचाल केल्यास यश निश्चितच मिळतं असं म्हणतात. 

गुजरात केडरच्या आयएएस अधिकारी डॉ. अंजू यांनी १९९१ मध्ये राजकोटमध्ये असिस्टंट कलेक्टर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर त्यांनी गांधीनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. यानंतर त्या विशेष सचिव, नंतर सचिव, प्रधान सचिव आणि आता अतिरिक्त मुख्य सचिव या पदापर्यंत पोहोचल्या आहेत.

अपयशानंतरही मानली नाही हार 

अंजू दहावीच्या परीक्षेत नापास झाल्या होत्या. तसेच बारावीच्या परीक्षेत त्या अर्थशास्त्र विषयात पास होऊ शकल्या नाहीत. मात्र, या अपयशासमोर त्यांनी हार मानण्यास नकार दिला आणि पुन्हा एकदा अभ्यास करून, पूर्ण लक्ष केंद्रित करून सुवर्णपदक मिळवलं. जयपूर येथून बीएससी आणि एमबीए पूर्ण करून युपीएससीची तयारी सुरू केली. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

अंजू म्हणतात की, परीक्षेला बसण्यासाठी शेवटच्या क्षणाच्या तयारीवर कोणीही अवलंबून राहू नये. याचं कारण असं की जोखीम जास्त असते. तयारीसह उजळणी करण्याची संधी कमी असते. दहावी आणि बारावीमध्ये चुका झाल्या. त्यामुळे यूपीएससीच्या तयारीसाठी योग्य रणनीती आखली आणि अभ्यास केला. त्या आयएएस टॉप स्कोरर बनल्या.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी