शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
3
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
4
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
5
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
6
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
8
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
9
हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
11
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
12
इराणमध्ये मोसादची भीती! अयातुल्ला खामेनेईंचा आता कोणावरही विश्वास नाही, स्वतःच्या सैन्याची सुरू केली चौकशी 
13
गरब्याची रंगत वाढणार! मुंबईत नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस लाऊडस्पीकरला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी
14
सोन्याची किंमत होती 99 रुपये तोळा, 77000 रुपयांपर्यंत कशी पोहोचली?
15
लक्ष्यभेद करणारा डोळा अन् चक्रव्यूह! 'बिग बॉस मराठी'ची चमचमती ट्रॉफी, टॉप ६ सदस्य पाहतच राहिले
16
"'ते' एक वाक्य अन् तुम्ही माझ्या करिअरचं वाटोळं केलं"; पंकजा मुंडेंनी हसत हसत हातच जोडले
17
आजोबांनी नातीसाठी फुगा आणला पण तोच जीवावर बेतला; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण
18
"इस्रायलला इशारा, अरब मुस्लिमांकडे मागितली साथ...; खामेनेईंच्या भाषणातील हे 10 मुद्दे आहेत खास
19
चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या खेळाडूंचा पगार रखडला; आता PCB ने केली सारवासारव
20
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड

CoronaVirus : सोशल डिस्टंसिंगचे तीन-तेरा, मुंबईनंतर आता दिल्लीतही हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले मजूर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 7:19 PM

दिवसागणिक देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यातच विविध राज्यांत अडकूण पडलेले मजूरही लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांचीही डोकेदुखी वाढली आहे.

ठळक मुद्देमुंबईनंतर आज दिल्लीतही हजारोंच्या संख्येने मजुरांनी यमुना नदीच्या काठावर गर्दी केली होतीया मजुरांना फळे देऊन दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या शेल्टर होममध्ये नेण्याचा प्रयत्न सुरू आहेअशा प्रकारे लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन होत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारांचीही डोकेदुखी वाढली आहे

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडॉऊनमुळे देशाच्या अनेक भागांत लोक जिथल्या तिथेच अडकून पडले होते.  सरकारने जारी केलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन पुन्हा 3 मेपर्यंत वाढवला. यामुळे या मजुरांची चिंता आणि भीती वाढली आहे. या काळात हाताला कामही नाही. यामुळे यांच्यावर उपासमारीचीही वेळ आली आहे. परिणामी हे मजूर आता आपल्या घराकडे जाण्यासाठी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरू लागले आहेत. असाच प्रकार मुंबईतील वांद्रा रेल्वेस्टेशननंतर आज (बुधवारी) दिल्लीतही बघायला मिळाला. येथे हजारोंच्या संख्येने मजुरांनी यमुना नदीच्या काठावर गर्दी केली होती.

मुंबई पाठोपाठ आता दिल्लीतही सोशल डिस्टंसिंगचे तीन-तेरा वाजताना दिसत आहेत. येथेही हजारोंच्या संख्येने मजूर रस्त्यावर उतरले आहेत. येथील यमुना नदीच्या काठावर हे सर्व मजूर एकत्र आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या मजुरांना फळे देऊन दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या शेल्टर होममध्ये नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे मजूर आपापल्या राज्यात जाण्यासाठी जमले आहेत, की आणखी काही कारणाने एकत्र आले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, येथे सोशल डिस्टंसिंगचे पार तीन-तेरा वाजताना दिसत आहे. 

दिवसागणिक देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यातच विविध राज्यांत अडकूण पडलेले मजूरही लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांचीही डोकेदुखी वाढली आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1118 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 39 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 11933 वर पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 392 वर गेला आहे. तसेच 1344 जण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी गेले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीIndiaभारतMumbaiमुंबईLabourकामगार