शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

लग्नात चप्पल चोरीस गेल्याने नवरदेव संतापला, मित्रांच्या मदतीने खून केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 17:22 IST

लग्नात चप्पल चोरीस गेल्याने संतापलेल्या नवरदेवाने मित्रांच्या मदतीने एका संशयित व्यक्तीचा खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून नवरदेव आणि त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बदायूं ( उत्तर प्रदेश) - लग्नात चप्पल चोरीस गेल्याने संतापलेल्या नवरदेवाने मित्रांच्या मदतीने एका संशयित व्यक्तीचा खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून नवरदेव आणि त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नवरदेव आणि त्याचे मित्र विवाह सोहळ्यामधील रीतिरिवाज पूर्ण करण्यासाठी सासरी आले होते. त्यावेळी ही घटना घडली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बदायूं जिल्ह्यातील बिल्सी येथील हा प्रकार आहे. येथील सुरेंद्र नावाच्या तरुणाचा विवाह सूरजपूर गावात होणार होता. बुधवारी सुरेंद्र वऱ्हाड घेऊन गावात आला. तेथे विवाहासाठी त्याने पायातील चपला काढून ठेवल्या. विवाहातील विधी पूर्ण झाल्यानंतर सुरेंद्रचा चपला हरवल्याचे समोर आले. त्यामुळे नवरदेव सुरेंद्र आणि त्याच्या मित्रांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांनी तेथेच उभ्या असलेल्या रामसरणवर चपला चोरल्याचा आरोप केला. वादावादी वाढताच त्यांनी रामसरण याल मारहाण करण्यास सुरुवात केली. तेथे उपस्थित असलेली मंडळी मध्यस्ती करून रामसरणला वाचवेपर्यंत नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी रामसरणला रक्तबंबाळ केले. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.  त्यानंतर मृत रामसरण याची पत्नी मीरा देवी हिने नवरदेवर सुरेंद्र आणि त्याच्या चार मित्रांवर हत्येचा आरोप करत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलियांनी या सर्वांवर हत्येचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, रामसरण याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.  

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेश