शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
4
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
5
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
6
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
7
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
8
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
9
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
10
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
11
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
12
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
13
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
14
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
15
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
16
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
17
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
18
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
19
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
20
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

संघर्षानंतर किसान मुक्ती यात्रा पुन्हा सुरू

By admin | Published: July 07, 2017 3:52 AM

स्वामीनाथन आयोग लागू करावा आणि शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त करावा, या मागण्यांसाठी देशभरातील शेतकरी संघटनांनी एकत्र

रमाकांत पाटील/लोकमत न्यूज नेटवर्कमंदसौर (मध्य प्रदेश) : स्वामीनाथन आयोग लागू करावा आणि शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त करावा, या मागण्यांसाठी देशभरातील शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन काढलेली किसान मुक्ती यात्रा मध्य प्रदेश पोलिसांनी पिपलीमंडी गावाजवळ अडवली. सुमारे दीड हजार कार्यकर्त्यांना अटक करून तासाभरात सुटका केली. यानंतर या यात्रेला पुन्हा सुरुवात झाली. दरम्यान, शनिवारी ८ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता लोणखेडा ता. शहादा येथे ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात पिपलीमंडी गावाजवळ ६ जून रोजी शेतकरी आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात सहा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर देशभरात शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला होता. त्यातून देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या सुमारे दोनशेहून अधिक संघटना एकवटल्या. या संघटनांनी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीची स्थापना करून ६ जुलैपासून मंदसौर ते दिल्ली अशी किसान मुक्ती यात्रा काढली आहे. गुरुवारी सकाळी नऊ वाजता बुढा या गावापासून या यात्रेला सुरुवात झाली. यात्रेच्या मार्गावरच पिंपरीमंडी हे गाव आहे. येथेच श्रद्धांजली सभा होणार होती. परंतु त्यासाठीची परवानगी पोलिसांनी नाकारली. मात्र तरीही त्या ठिकाणी यात्रा निघाली. १० किलोमीटर यात्रा सुरळीत सुरू होती. मात्र पुढे पिपलीमंडी गावाजवळ मध्य प्रदेश पोलिसांनी यात्रा अडविली....म्हणून परवानगी नाकारलीपिपलीमंडी येथे ज्या ठिकाणी गोळीबार झाला होता त्याच ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणार होतो. परंतु परवानगी नाकारली. यात्रा सुरळीत राहावी म्हणूनच आम्ही अटक करून घेतली. - व्ही.एम.सिंग, मुख्य समन्वयक किसान मुक्ती यात्रा.देशात सत्ता आल्यास स्वामीनाथन आयोग लागू करू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. आता दोन वर्षानंतर त्यांनी लागू केला नाही तर २०१९ मध्ये लाल किल्ल्यावर त्यांचे तिरंगा फडकविण्याचे स्वप्न शेतकरी पुर्ण होऊ देणार नाही.- खासदार राजू शेट्टीपिपरीमंडीजवळ शेतकरी, व्यापारी यांच्यातील संघर्ष पुन्हा होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. म्हणून जमावबंदी आदेश लागू केला.- श्रीवास्तव, जिल्हाधिकारी, मंदसौर.