शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

सर्जिकलनंतर पोलिटिकल वॉर सुरू

By admin | Published: October 08, 2016 5:37 AM

भारतीय लष्कराने सीमापार जाऊन पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या धाडसी सर्जिकल स्ट्राईकच्या पुराव्यांचा वाद १० दिवसांनंतरही शमता शमेना.

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- २८ सप्टेंबरच्या रात्री भारतीय लष्कराने सीमापार जाऊन पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या धाडसी सर्जिकल स्ट्राईकच्या पुराव्यांचा वाद १० दिवसांनंतरही शमता शमेना. भाजपच्या नेतृत्वाने कितीही नकार दिला तरी याबाबीचे ते राजकीय भांडवल करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसने भाजपवर टीका करण्यापूर्वी १९७१ च्या युद्धाकडे जरा पाहावे, असा सल्लाही शहांनी दिला आहे. काही उत्साही भाजप जिल्हाध्यक्षांना याबाबत पोस्टरबाजी करण्यास त्यांनी मनाई केली आहे. मात्र, लष्कराच्या कारवाईमागे समर्थ राजकीय इच्छाशक्ती व पाठबळ होते, असे आश्चर्यकारक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. हे कमी म्हणून की काय, भाजपा या घटनेचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करणार आहे, असे दिसते.दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपला या सर्जिकल स्ट्राईकचा फायदा मिळू नये, यासाठी सरसावले आहेत. राहुल गांधी यांच्या खून की दलाली या वक्तव्यावरही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीका केली असल्याने विरोधकांतही गोंधळाचे वातावरण असल्याचे दिसते. भाजपच्या जाळ्यात काँग्रेसने अडकू नये, असे जनता दल (यू)सह काही मित्र पक्षांनी आवाहन केले आहे. प्रशांत किशोर म्हणतात की, या घडीला लष्कराची प्रशंसा करा आणि राजकीय टीका टाळा. राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्यासाठी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी आज पक्ष मुख्यालयात अचानकपणे पत्रकार परिषद घ्यावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सैनिकांच्या रक्ताच्या मागे लपत असून, त्यांच्या बलिदानाचे राजकीय शोषण करीत असल्याचा आरोप राहुल यांनी गुरुवारी केला होता. सर्जिकल स्ट्राईकवरील विधानांवरून अरविंद केजरीवाल अडचणीत आले होते. त्यांच्यावर चोहीकडून टीकेचा भडिमार सुरू होता. राहुल यांच्या विधानांमुळे त्यांना थोडा दिलासा मिळाला, असे म्हणता येईल. केजरीवाल यांनी सर्जिकलबाबत केलेली विधाने पाकिस्तानात गाजली. मात्र, त्यामुळे पंजाबमधील त्यांचे समर्थक चिंतातुर झाले आहेत. >केवळ सैन्याचा सत्कार केला पाहिजे...बसपाप्रमुख मायावती यांनीही या वादात उडी घेतली. सर्जिकल स्ट्राइकबाबत केवळ सैन्याचा सत्कार केला गेला पाहिजे ना की पंतप्रधान किंवा संरक्षणमंत्र्याचा, असे त्या म्हणाल्या. स्ट्राइकबद्दल मनोहर पर्रीकर यांचा गुरुवारी मथुरेत सत्कार करण्यात आला. मायावतींचा रोख त्याकडेच होता. >पाकिस्तानचे भारताच्या नावाने बोटे मोडणे सुरूचकाश्मीरमधील जनतेवर सुरक्षा दलांकडून होणाऱ्या अन्याय व अत्याचारांचा निषेध करतानाच, आम्ही काश्मिरी जनतेच्या लढ्यात सोबत आहोत, कारण काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग नाही आहे, असा ठराव शुक्रवारी पाकिस्तानच्या संसदेत एकमताने संमत करण्यात आला. काश्मीरमधील जनतेवरील अत्याचार रोखण्यास आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.