शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

रोहिंग्यांना फ्लॅट्स नव्हे, डिटेन्शन सेंटर्समध्येच ठेवलं जाणार; मंत्र्याच्या वक्तव्यानंतर, गृहमंत्रालयाचं स्पष्टिकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 17:04 IST

सरकार परराष्ट्रमंत्रालयाच्या माध्यमाने अवैध परदेशी निर्वासितांसंदर्भात संबंधित देशांसोबत चर्चा करत आहे. यामुळे रोहिंग्यांना सध्या असलेल्या ठिकाणीच ठेवण्यासंदर्भात सांगण्यात आले आहे, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या रोहिंग्या (Rohingya) शरणार्थींना वसविण्यासंदर्भातील वक्तव्याने मोठी खळबळ उडाली होती. आता, यासंदर्भात खुद्द गृहमंत्रालयानेच स्पष्टिकरण दिले आहे. रोहिंग्या शरणार्थी डिटेन्शन सेंटर्समध्येच राहणार, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी, रोहिंग्या शरणार्थींना दिल्लीतील EWS फ्लॅट्समध्ये स्थलांतरित करण्यात येईल, असे हरदीप पुरी यांनी म्हटले होते.

यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या निवेदनात गृह मंत्रालयाने (MHA) म्हटले आहे, की मंत्रालयाने बेकायदेशीर स्थलांतरित रोहिंग्यांना नवी दिल्लीतील बक्करवाला (Bakkarwala) येथील EWS फ्लॅटमध्ये ठेवण्यासंदर्भात कसल्याही प्रकारचे निर्देश दिलेले नाहीत. तसेच, दिल्ली सरकारने रोहिंग्यांना नव्या लोकेशनवर हलविण्याचा प्रस्ताव दिला होता. यावर, रोहिंग्यांना सध्याचे लोकेशन कंचन कुंज (मदनपूर खादर) येथेच ठेवण्यात यावे, असे निर्देश गृहमंत्रालयाने दिल्ली सरकारला दिले आहेत, असे सांगण्यात येत आहे.

एवढेच नाही, तर सरकार परराष्ट्रमंत्रालयाच्या माध्यमाने अवैध परदेशी निर्वासितांसंदर्भात संबंधित देशांसोबत चर्चा करत आहे. यामुळे रोहिंग्यांना सध्या असलेल्या ठिकाणीच ठेवण्यासंदर्भात सांगण्यात आले आहे, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे. याशिवाय, अवैध परदेशी निर्वासितांना त्यांच्या देशात पाठवेपर्यंत डिटेन्शन सेंटर्समध्येच ठेवण्यात येईल. मात्र, दिल्ली सरकारने अद्याप सध्याचे लोकेशन डिटेन्शन सेंटर म्हणून घोषित केलेले नाही. त्यांनी ते तत्काळ डिटेन्शन सेंटर म्हणून घोषित करावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

काय म्हणाले होते हरदीप सिंग पुरी?"भारत आश्रय मागणाऱ्या लोकांचे नेहमीच स्वागत करतो. एक ऐतिहासिक निर्णय घेत सर्व रोहिंग्या शरणार्थींना दिल्लीतील बक्करवाला भागातील EWS फ्लॅट्समध्ये शिफ्ट करण्या येईल. त्यांना मूलभूत सुविधा, UNHRC आयडी आणि 24 तास दिल्ली पोलिसांचे संरक्षण देण्यात येईल," अशा आशयाचे ट्विट हरदीप सिंग पुरी यांनी केले होते. त्यांच्या या ट्विटनंतर मोठी खळबळ उडाली होती.

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याdelhiदिल्लीBJPभाजपा