शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

EVM वरून पुन्हा वाद, विरोधकांची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 19:21 IST

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर इव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नवी दिल्ली -   लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर इव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विरोधी पक्षांच्या आज झालेल्या बैठकीमध्ये ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून  पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धावा घेण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे. या बैठकीमध्ये सहा विरोधी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  दरम्यान, विरोधी पक्षांची ही बैठक म्हणजे निवडणूक संपण्यापूर्वीच पारभव पत्करल्याचे उदाहरण असल्याचा टोला भाजपाने लगावला आहे.या बैठकीनंतर टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आणि काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ईव्हीएममध्ये गोंधळ झाल्याचा आरोप करत शनिवारी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान चार हजारांहून अधिक इव्हीएम खराब झाल्या होत्या, असा आरोप नायडू यांनी केला.  ''आम्ही ईव्हीएमच्या मुद्द्यावरून पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोता. जगाच्या पाठीवर ईव्हीएमचा वापर करणारे खूपच कमी देश आहेत. जर आम्हाला मतदारांचा विश्वास पुन्हा मिळवायचा असेल तर मतपत्रिकेव्दारे मतदान घेतले पाहिजे,'' असे नायडू यांनी सांगितले.पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. मात्र निवडणूक आयोग याकडे पुरेसे लक्ष देत आहे, असे वाटत नाही.जर तुम्ही एक्स पार्टीला मत दिले तर मत वाय पार्टीला जात आहे. तसेच व्हीव्हीपॅट मशीनमधून येणारी चिठ्ठीसुद्धा 7 सेकंदांऐवजी तीन सेकंदच दिसत आहे,असा आरोप काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसAam Admi partyआम आदमी पार्टीTelugu Desam Partyतेलगू देसम पार्टीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय